करुणादेवी/राजधानीत

विकिस्रोत कडून
रा ज धा नी त
♣ * * * * * * ♣







  “हेमा,येतेस ना?” आदित्यनारायणांनी विचारले. “ मी नाही येत !” ती म्हणाली.

 “ साऱ्या राज्यातील तरुण येथे जमले आहेत. तुला कोणता पसंत पडतो बघ. हेमा, तू आमची एकुलती एक मुलगी. तुझे सुख ते आमचे. तू नेहमी लग्न नको असे का म्हणतेस ? तू अशी विरक्त का ?”

 “ तुमच्यावर प्रेम आहे म्हणून. उद्या माझे लग्न झाले, म्हणजे मला येथे थोडेच राहाता येणार आहे? तुमचा तर माझ्यावर जीव.”

 “ परंतु तुझ्या पतीला घरजावई करीन.”

 " त्यांना न आवडले तर ? त्धांना त्यात मिधेपणा वाटला तर ?"

  “ तुझ्या पतीला येथे मोठी नोकरी लावून देईन.”

 “ परंतु त्यांना नको असली तर नोकरी ? येथे राहाणे नको असेल तर ?"

 “ हेमा. येथे जे तरुण आले आहेत, ते उगीच नाही आले. महत्त्वाकांक्षेने आले आहेत. त्यांना राजधानीत मोठी नोकरी मिळाली, तर का आवडणार नाही ? बुद्धिमान लोक महत्त्वाकांक्षी असतात. आपल्या बुद्धीची प्रभा सर्वत्र फाकावी असे त्यांना वाटते. मी तुला एक विचारू ?”

 "काय?"

  “ह्या जमलेल्या तरुणांत जो पहिला येईल त्याच्याशी तू करशील का लग्न ? जो पहिला येईल त्याला राजा प्रधान करील. म्हणजे मग तूही येथेच राहाशील. तुझी व आमची नेहमी भेट होत जाईल. चालेल का ?”  "तुम्ही सांगाल ते मला मान्य आहे. तुमच्या सुखासाठी मो सारे करीन."

 " मग नाही येत माझ्याबरोबर?"

 "नको. एखाद्या तरुणावर, समजा, माझे प्रेम जडले आणि तो बुद्धिमान नसला तर? त्याला मग थोडेच येथे राहाता येईल? ते नंकोच. तुम्ही ज्याच्याशी लग्न लावाल त्याच्याशी मी आनंदाने संसार करीन.”

 "हेमा, मुलगी असावी तर तुझ्यासारखी. धन्य आहेस तू !"

 असे म्हणून आदित्यनारायण निघून गेले.

 विद्यापोठाच्या वसतिगृहात राज्यातील वेचक तरुणांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचा विशिष्ट अभ्यास चालला होता. आदित्यनारायण मधून मधून ह्या वसतिगृहात येत व वरसंशोधन करीत असत.

 आज ते वसतिगृहात आले, तो काही तरी तेथे गडबड होती.

 "काय आहे ? काय आहे ?" आदित्यनारायण विचारत होते.

 "रस्त्यात एक लहान मूल होते. तिकडून एक मस्त हेला शिगे उगारून येत होता. परंतु येथील एक विद्यार्थी, शिरीष, विजेप्रमाणे धावत गेला व त्या मुलाला त्याने वाचवले. सारे त्याची स्तुती करीत आहेत." चालक म्हणाले.

 "कोठे आहे तो तरुण ?"

 " तो पाहा."

 शिरीषला तेथे बोलावण्यात आले. सुंदर सुकुमार शिरीष तेथे नम्रपणे उभा होता. तो सुकुमार असून वीर होता. फुलाप्रमाणे दिसत होता, परंतु वज्रवृत्तीचाही होता.

 "शाबास तुमची. महाराजांच्या कानांवर घातले पाहिजे.” आदित्यनारायण म्हणाले.

 "महाराजांच्या कानावर ह्यांची कीर्ती आधीच गेली आहे. ज्यांना खास दूत पाठवून आणण्यात आले, तेच हे शिरीष !” चालकांनी सांगितले.

 आदित्यनारायण निघून गेले आणि थोड्या वेळाने त्यांची मुलगी हेमा त्या वसतिगृहाकडे आली. सुवर्णासारखी तिची कांती होती. रेशमी बहुमोल वस्त्र ती नेसली होती. मोत्यांचे अलंकार तिच्या अंगावर होते. सारे तरुण तिच्याकडे पाहू लागले.

 चालक सामोरे आले.

 “ माझे बाबा इकडे आले होते ना ?” तिने विचारले.

  “ ते तर गेले.”

 “ इतक्यात कसे गेले ? ह्या तरुणांची परीक्षा घ्यायला ते आले होते ना ?”

 “ तसे काही बोलले नाहीत.”

  “ बरे, मी जात्ये.”

 “ थांबा. नोकर गेला आहे. माळ्याकडून फुले आणायला गेला आहे. फुलांची भेट घेऊन जा.”

 “ हे येथे इतके विद्यार्थी आहेत. त्यांना मी एक प्रश्न विचारू ?”

 "विचारा.”

 “तुम्ही सारे मोठी नोकरी मिळावी म्हणूनच आला आहात का ?”

 “हो, हो !” सारे म्हणाले.

 “ मला नको नोकरी !” एक आवाज आला.

 “ कोण म्हणतो, नको नोकरी ?” तिने विचारले.

 “ हा शिरीष !” सारे हसून म्हणाले.

 “ तुम्हाला नको नोकरी ?” तिने गंभीरपणे प्रश्न केला.

 "नको !” तो म्हणाला.

 “ का ?”

 “ मला खेड्यातच राहू दे. तेथे आईबापांची सेवा करू दे.”

 "आईबापांना येथे आणा“

 “परंतु नकोच. नोकरी नकोच.” हेमा निघून गेली.

 ते सारे तरुण विद्यार्थी शिरीषची थट्टा करू लागले.

 “ शिरीष, थोर आहे राजा तुझे नशीब.”

 “ राजाचा प्रधान होशील.”

 “ प्रधानाचा जाबई होशील.”

 अशी थट्टा चालली होती. परंतु शिरीष तेथे थांबला नाही. का नाही?  एके दिवशी हेमा शीतला नदीच्या तीरी मैत्रिणीसह हिंडत होती. शिरीषही नदीतीरी होता. शेकडो लोकांची जा- ये सुरू होती. शिरीष एकटाच तीरातीराने गेला व एका झाडाखाली बसला. तो शून्य दृष्टीने कोठे तरी पाहात होता ! त्माला का आईबापांची आठवण येत होती ? करुणेची आठवण येत होती ?

 ती पहा हेमा पळत पळत येत आहे.

 " काय झाले ? का पळता ?” शिरीषने विचारले.

 “ तुमच्याजवळ दोन शब्द बोलावे म्हणून.”

 “ त्यासाठी पळत येण्याची काय जरूरी ?"

 “ मैत्रिणींना चुकवण्यासाठी. हं, बोला. दोन शब्द बोला.”

 “ दहा शब्द झाले, ” तो म्हणाला.

 “ शब्दात पकडणे बरे नव्हे.”

 "मग कशात पकडाचे ?"

 “ प्रेमात पकडावे."

 “ मला काही समजत नाही.”

 “ तुम्ही तर सर्वात हुशार असे सारे म्हणतात.”

 "म्हणोत बिचारे, ”

  “ तुम्ही दु:खी का ? तुम्हाला घरची आठवण येते ? आईबापांची येते. होय ना ?”

 " होय."

  “ आणखी कोणाची ?”

 “ काय सांगू ? त्या पाहा तुमच्या मैत्रिणी आल्या."

 “ हे घ्या तुम्हाला फूल, कसले आहे ओळखा.”

 " माझ्या नावाचे."

  “ तुमचे नाव शिरीष वाटते?”

  “ विचारता कशाला ? तुम्हाला माहीतच आहे.”

  “ कोण म्हणतो माहीत आहे?”

 “ मी म्हणतो. माझे नाव माहीत नसते, तर हे फूल तुम्ही आणलेच नसतेत. आणि त्या दिवशी वसतिगृहात माझे नाव तुम्ही ऐकले होते.”



"शब्दात पकडणे बरे नव्हे"
 “ एकदा ऐकल्याने नाव थोडेच लक्षात राहाते !”

 “ त्या पाड़ा मैत्रिणी आल्या. झाडाआड लपा. गंमत होईल. लपा. ”

 “ तुमच्याआड लपते.”

 “ मी जातो. तुम्ही येथे लपा. ”

 तो गेला. हेमा तेथे लपून राहिली. मैत्रिणी पाहात पाहात येत होत्या.

 “ तुम्हाला इकडे मुख्य प्रधानांची मुलगी दिसली का ?” एकीने विचारले.

 “ मी माझ्या विचारात होतो. माझे लक्ष नव्हते. त्या हरवल्या वाटते?” त्याने विचारले.

 " इकडे ती पळत आली."

 “ उडी नाही ना घेतली नदीत ?” त्याने गंभीरपणे म्हटले.

 “ तुम्ही पाहा हो आमच्यासाठी, ” मैत्रिणी म्हणाल्या.

  “ शोधतो हा.”

 शिरीष मागे वळला. इकडे तिकडे खोटेच शोधू लागला. आणि तो त्या झाडाजवळ आला. त्याने टाळ्या वाजवल्या. मैत्रिणी धावतच आल्या.

 “ आहे का हो ?”

 “ ह्याच का, बघा. ”

 “ अहो हीच. हेमा, किती बाई शोधायचे तुला. हे होते म्हणून सापडलीस."

 “ जातो मी. ?"

 “ आभारी आहोत आम्ही.”

 शिरोष निघून गेला. हेमा पुन्हा पळणार होती, परंतु मैत्रिणींनी तिला बळकट धरले.

 “ धरता काय ? त्यांना काही द्यायला नको का ? मी रस्ता चुकून घाबरून उभी होत्ये. त्यांनी तुमची व माझी भेट करून दिली. त्यांना काही द्यायला नकी का ?"

 "काय द्यायचे ?"

 “ ही आंगठी देऊ ?”

 “ वेडी आहेस तू. चल आता घरी. ”  हेमा एकदम मुकी झाली. मैत्रिणींबरोबर ती घरी आली. हेमा अलीकडे देवीच्या देवळात जाऊ लागली. फुलांचे हार नेई. देवीच्या गळ्यात घाली. हात जोडून मनोभावाने प्रार्थना करी. कसली प्रार्थना ? तिला काय कमी होते ?

 वर्ष संपत आले. त्या सर्व तरुण विद्याथ्र्याची परीक्षा झाली आणि परीक्षेत शिरीष पहिला आला. आपण उत्तीर्ण होऊ नये असे त्याला पूर्वी वाटे. आपण वेडीवाकडी उत्तरे देऊ असे त्याला पूर्वी वाटे, परंतु अलीकडे बाटत नसे. तो हुशार होताच. त्याने अभ्यास केला. त्याला फळ मिळाले.

 एके दिवशी पदवीदान-समारंभ झाला. स्वतः राजा यशोधर आला होता. त्याने उत्तीर्ण विद्याथ्याँस पदव्या दिल्या.शिरीषला त्याने सुवर्णपदक दिले. राजाने सर्व उत्तीर्ण विद्याथ्यास उद्देशून उपदेशपर भाषण केले :

 “ उत्तीर्ण तरुणांनो, देशातील बुद्धिमत्ता हाती यावी, देशातील सद्गुण दाती यावेत म्हणून ही परीक्षा होती. तुम्ही वर्षभर येथे होतात. तुमची वागणूक, तुमचे चारित्र्य येथे पाहिले जात होते. बौद्धिक गुणांबरोबरच तुमच्या हृदयाच्या गुणांचीही येथे पारख केली जात होती. अनेकांचे डोळे तुमच्या वतंनाकडे येथे होते. जे. तुम्ही उत्तीर्ण झाला आहात, त्यांना निरनिराळ्या कामावर हळूहळू नेमले जाईल. लक्षात ठेवा, की तुम्हाला प्रजेजी सेवा करायची आहे. जनता तुम्हाला पगार देणार, तुम्हास पोसणार. जनता तुम्हाला मान देईल, परंतु तुम्ही जनतेला मान द्या. ईश्वरासमोर एक दिवस झाडा द्यायचा आहे हे विसरू नका.”

 समारंभ संपला. उत्तीर्ण तरुण आनंदात होते. राजधानीतील सुखे भोगीत होते. इकडे तिकडे हिंडत होते, फिरत होते, परंतु शिरीष कोठे आहे ?

 तो शीतला नदीच्या तीरी बसला होता.

  ती पाहा हेमा आली.

 “ तुम्ही पहिले आलेत, होय ना ?”

 “ हो, आलो, ”

 “ तुम्हाला त्याचा आनंद नाही होत ?”

 “ माझ्या आईबापांना खरा आनंद होईल. ”  “ आणखी कोणाला होईल ?”

 “ आणखी कोणाला होईल ?”

 “ मला होईल. तुम्ही पहिले यावे म्हणून मी जगदंबेची रोज पूजा करीत होते. ”

 “ तुमचा माझा काय संबंध ?”

 “ दुस-याचे कल्याण का इच्छू नये ?”

 “ परंतु मीच पहिले यावे म्हणून का तुमचा नवस ? इतर कोणासाठी का केला नाहीत ?”

 “ मला नाही सांगता येत. मी जाते.”

 “ मी तुमच्या नवसाने पहिला आलो, की माझ्या बुद्धिमतेने ?”

 “ आणि स्वतःच्या बुद्धिमतेने आला असला, तरी ती कोणाची देणगी ? त्याची ऐट तुम्हाला कशाला ? बुद्धी हीसुद्धा देवाचीच देणगी आहे."

 “ खरे आहे. मी एक क्षुद्र जीव आहे.”

 “ परंतु क्षुद्र जीवही कोणाचा तरी देव असतो. "

 " हो, असेल, "

 “ मी जाते. आज रात्री राजधानीत दीपोत्सव आहे. तुम्ही रात्री पाहायला जाल ?”

 “ हृदयात अंधार असेल तर बाहेरचे दिवे काय कामाचे ?”

 “ तुम्ही तुमच्या हृदयात दिवा लावा. जगात सर्वत्र प्रकाश असता तुम्ही स्वतःच्या हृदयाची दारे बंद का करता ? आणि मग प्रकाश नाही म्हणून रडता का ? आपणच दिवा विझवायचा व पुन्हा अंधार आहे म्इणून रडायचे, हे बरे नव्हे. ”

 “ तुम्ही किती सुंदर बोलता ? परंतु माझ्यासाठी नवस का केलात ते सांगा."

 “ तुम्हाला नाही त्याचे उत्तर देता येत ?”

 “ नाही.”

 “ तिकडे पहिले आलेत; परंतु येथे हरलेत.”

 “ हो हरलो. सांगा ना, का केलात नवस ?”  “ तुम्हाला माहीत आहे. मी जाते. मैत्रिणी शोधीत येतील. आज रात्री जा हा दीपोत्सव पाहायला. आमच्या घराजवळही या. आमच्या घरावरही आज शेकडो, हजारो दीप लागतील. तुम्ही तुमच्या हृदयातही लावा. माझ्या घराजवळ तरी लावा. लावाल ना ?”

 "बघेन. ?"

 "मी जाते."

 ती गेली. शिरीष तेथेच होता. रात्र झाली. आकाशात लाखो दीप लागले, आणि मुक्तापूर राजधानीतही आज लाखो दीप पाजळत होते. वसतिगृहातील विद्यार्थी दीप-शोभा पाहाण्यासाठी हिंडत होते. आसपासच्या खेडेगावांतून हजारो स्त्रीपुरुष आले होते. मुकापूर राजधानीने हजारो हिरेमाणकांच्या माळाच जणू काय गळ्यात घातल्या होत्या. सुंदर प्रसन्न देखावा !

 हेमा आपल्या प्रासादाच्या पायच्यावर उभी होती. ती अलंकारांनी नटलेली होती. जणू देवतेप्रमाणे तेथे ती दिसत होतं. गर्दी येत जात होती. हेमा कोणाची वाट पाहात होती ?

 ती पाहा शिरीष आला. हा पाहा एक दिवा विझला. हेमा दिवा लावू लागली. परंतु दिवा लागेना. तिने शिरीषकडे पाहिले.

 “ शिरोष, ये. आपण दिवा लावू. ”

 “ दे, मी लावतो.”

 “ शिरोषने दिवा लावला व तो जाऊ लागला.

 “ शिरीष, दिवा विझू नको हो देऊ. राजधानीतील दिवे उद्या दिसणार नाहीत, परंतु हृदयात लागलेला दिवा कधी विझू नये....." ती म्हणाली.