पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

बनला आहे. वाढत्या माध्यम प्रभाव व प्रसारामुळे वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांनी गाव ग्रासलेली आहेत. पूर्वी गाव एक पक्षीय होतं. बहुपक्षीय लोकशाही समृद्ध खरी. पण गावात वाढणाच्या पुढा-यांच्या संख्या व प्रभावामुळे तरुणाई राजकारणाच्या नादी लागल्याचं चित्र आहे. शहरात वा गावात पुढा-यांच्या मागे धावणाच्या तरुणांचे तांडे माझ्यासारख्या शिक्षक, कार्यकर्त्यास अस्वस्थ करतात. पूर्वीही राजकारण्यांच्या मागे तरुणांचे तांडे, जत्थे होते. महात्मा गांधींच्या मागेपण होते. पण त्यामागे ध्येय होतं. ध्यास होता. विचार होता आज तसे चित्र नाही. तरूण पदवीधर बेरोजगार आहेत. शेतीशी त्यांची असलेली नाळ व नातं तुटत आहे. व्यवसायापेक्षा नोकरी बरी असा जनमताचा कौल झुकतो आहे. डेअरी, सोसायटी, शाळा, कॉलेज, साखर कारखाने, पतसंस्था या सर्व गावच्या प्रभावी राजकीय कार्यकत्र्यांच्या हाती आहेत. तरुणांचे तांडे त्यांच्या मागे फिरण्यामागे नोकरीचं मृगजळ आहे. निराशेनं वैफल्यग्रस्त होणारे तरूण व्यसनाधीन होत आहे. छानछोकी राहणी, ढाब्यांवरची भोजनावळ, मोटारसायकलवरच्या त्रिकुटांच्या सफरी, सटर फटर कारणासाठी गेल्या आठवड्यात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रम शिबिराच्या निमित्ताने सांगवडे गावी पुन्हा जाण्याचा योग आला या गावात याच निमित्ताने आठ-दहा वर्षांपूर्वी गेलो होतो. त्या वेळी गावचे जे दृष्य मी पाहिले होते ते पाहून गाव हागणदारीमुक्त व्हायला पाहिजे असे मी आग्रहाने सांगितले होते. त्या वेळी लोक हसले होते. कुणी ते फारस मनावर घेतलं नव्हतं आता निर्मलग्राम योजनेचा शासनाचा रेटा आहे. अनुदान बंद होणार, वीज तोडली जाणार, पाणीपुरवठा बंद होणार या भीतीने ग्रामपंचायत व ग्रामस्थ जागे झालेत. थोड्या दिवसात हे गाव निर्मलग्राम बनेल असा मला विश्वास आहे.

       भारतातील खेड्यांचा विचार करत असताना मला नेहमी महात्मा गांधीचं एक वाक्य आठवतं ते म्हणाले होते, ‘तुम्हाला खरा भारत पाहायचा आहे ना? मग एखादं खेड पाहा' आज खेडी बदलत आहेत. ती निर्मलग्राम होत आहेत. तंटामुक्त गाव होण्याच्या दिशने त्याची धडपड आहे. पंतप्रधान सडक सुधार योजनेतून रस्ते होत आहेत. त्यांना ‘जलस्वराज्य' लाभत आहे. ती ‘बिमा ग्राम' होत आहेत. महिला बचत गटांनी स्त्रियांच्या हातात अर्थसता नेण्यास सुरुवात केली आहे. दुधाचा महापूर वाहतो आहे. (दर मिळत नसला तरी) सर्व शिक्षण अभियानातून साक्षरता वाढते आहे. इंदिरा आवास योजनेतून भूमिहिनांना घरकुले लाभत आहे. हे सारं एकीकडे होत असताना दुसरीकडे राजकारणाने गावाला पोखरून टाकलं आहे.

जाणिवांची आरास/१२७