सप्तशती गुरूचरित्र/अध्याय पंचविसावा

विकिस्रोत कडून

होते मंदधीब्राह्मण । म्लेच्छराजापुढें येऊन । सार्थवेद म्हणून । घेती धन उन्मत्त ते ॥१॥

म्लेच्छा मदोन्मत्त विप्र । म्हणती आज्ञा द्यावी क्षिप्र । वादें जिंकूं लोकीं विप्र । हारिपत्र किंवा घेवूं ॥२॥

राव महानंदे देत । आज्ञा बसवी पालखीत । विप्र राजे म्हणवीत । भूमी जिंकित येती तेथ ॥३॥

ते कुमसी मध्यें यती । त्रिविक्रमभारती । त्रिवेदी जाणुनियां येती । त्या म्हणती वाद करीं ॥४॥

जरी मैत्रद्विज असे । तरी करील कीं असें । कुबुद्धि हे विप्र जसे । हरती तसें करावें ॥५॥

यांची वांछा गुरु पुरवील । असें म्हणोनी त्यां तत्काळ । यती आणी गुरुजवळ । सांगे सकळत्रिविक्रम ॥६॥

वाद्यां शोधीत हे आले । यांणीं माझें न ऐकिलें । मग येथें आणिले । या शिक्षिले पाहिजेत ॥७॥

गुरुजी म्हणती तया । नेणो आम्ही जयाऽजया । वाद आम्हाम कासया । तुम्हीं वाया मरुं नका ॥८॥

विप्र वचन बोलती । तुम्हां काय विद्या येती । तें ऐकूनि गुरु म्हणती । गर्व किती करितां हा ॥९॥

गर्वे लोकीं किती मेले । बाण रावण खपले । व्यर्थ कौरवादी मेले । आरंभिलें काय हें तुम्हीं ॥१०॥

इति श्री०प०प०वा०स०वि० सारे उन्मत्तद्विजाख्यानं नाम पंचविशो०


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]