राजा शेतकरी
Jump to navigation
Jump to search
जसा बोल्यले कर्रय तसा कामाले करारी
सभावानं मन मोका असोद्याचा शेतकरी
कारामधी रोखठोक नही उसनउधारी
दोन देये दोन घेये असा राजा शेतकरी
असा राजा शेतकरी चालला रे आढवनी
देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकसनी
बोरू चाले कुरुकुरु तश्या पाट्या पेनाशिली
पोर्हं निंघाले शिक्याले कधीमधी टांगटोली
हाया समोरची शाया पोर्हं शायीतून आले
हुंदडत हायाकडे ढोरं पान्यावर गेले
अरे असोद्याची शाया पोर्हं शंबर शंबर
शायामधी भारी शाया तिचा पह्यला नंबर
इमानानं शिकाळती तठी 'आबा' मायबाप
देती अवघ्याले इद्या भरीभरीसनी माप
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |