भाग २ रा-अर्थशास्त्राची व्याख्या व शास्त्रीय पद्धति

विकिस्रोत कडून

भाग दुसरा. ]अर्थशास्त्राची व्याख्या व शास्त्रीय पद्धती एखादे स्थळ किवा प्रदेश पहावयास निघाले असतां ज्याप्रमाणे स्थळाचा किंवा प्रदेशाचा जवळ असला म्हणजे ते स्थळ किंवा

तो

प्रदेश पहाणे सुलभ जाऊन त्रास व वेळ वांचतो; व शिवाय आपल्याला मनोरंजन व ज्ञानप्राप्ती जास्त करून घेतां येते, त्याप्रमाणेच कोणत्याही विषयाच्या अगर शास्त्राच्या अरंभी दिलेल्या त्या विषयाच्या अगर शास्त्राच्या व्याख्येची गोष्ट आहे.त्याचेयोगाने तो विषय किंवा शास्त्र समजण्यास व त्यापासून सत्यज्ञान-ज्ञानाचा आभास नव्हे-होण्यास फार मदत होते. यामुळे सर्व ग्रंथकारांची प्रथमारंभीं हाती घेतलेल्या शास्त्राची व्याख्या देण्याची रीत आहेत्या रीतीस अनुसरून येथेही अर्थशास्त्राची शास्त्रीय व्याख्या देण्याचा विचार आहे.
अतज्ज्ञ अशा सामान्य माणसास अर्थशास्त्र स्हणजे काय असा प्रश्न केल्यास तो म्हणेल , व्यापारउदीम व उद्योगधंद्यांची माहिती देणारा जो विषय अर्थशास्त्र होय. या व्यावहारिक कल्पनेला पारिभाषिक शब्दांचा पोषाख चढवून कांहीं ग्रंथकारांनी हीच अर्थशास्त्राची शास्त्रीय व्याख्या म्हणून मानली ऊदारहणार्थ, मँकलाऊडने आपल्या ग्रंथांत अदलाबदल अगर विनिमय यांची मीमासा किंवा उपपत्ति करणारे शास्त्र त अर्थशास्त्र होय अशी अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे. या व्याख्येंत व सामान्य माणसाच्या कल्पनेत पारिभाषिक शब्दांखेरीज दुसरा भेद नाहीं हें वाचकांच्या तेव्हांच ध्यानांत येईल. परंतु या व्याख्येनें अर्थशास्त्राचा यथार्थ बोध होत नाही. शिवाय या व्याख्येवर अव्याप्तीचा दोष येतो. अर्थात् ही व्याख्या फार संकु चित आहे. व्याख्येत अर्थशास्त्रांत वास्तविकपणें अंतर्भूत होणाऱ्या सर्व
विषयांचा समावेश होत नाही.कारण,व्यापार विनिमय यांची

मीमांसा हा अर्थशास्त्राचा एक भाग अगर अंग आहे. परंतु अर्थशास्त्राचीं
[३३]

 दुसरी अंगे आहेत, तीं या व्याख्येने वगळली जातात; तेव्हां, ही व्याख्या सदोष म्हणूनच टाकाऊ आहे
{{gap}]अर्थशास्त्राची दुसरी एक व्याख्या केली जाते, याव्याख्येप्रमाणे अर्थशास्त्र हे एक नीतिशास्त्राचा भाग गणिलें असून तें मानवी कल्याणाच्या आधिभौतिक साधनांच्या सिद्धीबद्दलच्या व्यक्तीच्या व समाजाच्या कृत्यांचा विचार करतें असे म्हटले आहे. परंतु ही व्याख्या इतकी व्यापक आहे कीं, तिच्यावर अतिव्याप्तीचा दोष येतो. म्हणजे ही व्याख्या फारच विस्तृत आहे. कारण या व्याख्येच्या योगाने नीतिशास्त्र, आरोग्यशास्त्र वगैरे सर्व शास्त्रांचा या शास्त्रात अंतर्भाव होऊ लागेल. वरील दोन्ही व्याख्येतील दोष परस्पर विरोधी परंतु अगदीं उघड व स्पष्ट आहेत. यामुळे या दोन व्याख्या एखाद दुसऱ्याच ग्रंथकारानें ग्राह्य धरलेल्या दिसून येतात. सामान्यतः अर्थशास्त्रज्ञ किंवा इतर लोक यांना या दोन्ही व्याख्या पसंत नाहीत असे दिसते. परंतु या पुढे विचार करावयाची व्याख्या मात्र पुष्कळ ग्रंथांत दिलेली आढळून येते. ती व्याख्या ही. संपत्तीची उत्पाति, वांटणी व अदलाबदल यांचा ऊहापोह करणारे शास्त्र तें अर्थशास्त्र होय.,
 या व्याख्येमध्ये अर्थशास्त्राच्या तीन अंगांचा प्राधान्यकरून उल्लेख आलेला आहे. परंतु अर्थशास्त्रावरील बहुतेक ग्रंथांत सरकारच्या कराचीं तत्वें दिलेली असतात. तेव्हां हेही एक अर्थशास्त्राचे अंग आहे. व या दृष्टीने या अंगाच व्याख्येंत अंतर्भाव झाला पाहिजे असे म्हणावे लागते तसेच कांही ग्रंथकार व्यय किंवा उपभोग म्हणून अर्थशास्त्राचे आणखी एक अंग कल्पितात; तेव्हा याचाही उल्लेख व्याख्येत आला पाहिजे. याप्रमाणे अर्थशास्त्रांतील विषयाच्या वाढीबरोबर अर्थशास्त्राच्या व्याख्येत नवीन नवीन अंगाचा अन्तर्भाव करवा लागेल. परंतु वरच्या व्याख्येत स्वीकारलेली व्याख्या करण्याची पद्धति योग्य नाही. कारण कोणत्याही पधार्ताची व्याख्य
आपण त्यांत अंतर्भूत होणाया अंगावरून किंवा अवयवावरून करीत नाही. तर्कशास्त्रामध्ये ज्याला गुणागम म्हणतात त्यावरुन वस्तूच्या व्याख्या किंवा लक्षण करणें हीच खरी शास्त्रीय पद्धति आहे. वस्तूच्या संख्यागमावरून किंवा त्यांतील अवयवावरून व्याख्या करणे गैर आहे. अर्थशास्त्राच्या वर दिलेल्या व्याख्येत हा मोठा दोष आहे.अर्थशास्त्राची अमुक अमुक अंगे आहेत असे सांगणे म्हणजे त्या शास्त्राची व्याख्या करणें नव्हें; तर ते

• •
[३४]

शास्त्रविषयाचें वर्गीकरण करणें होय. खरी व्याख्या वस्तूमध्यें असलेल्या सर्वसाधारण महत्वाच्या गुणांवरून केली पाहिजे.

वर निर्दिष्ट केलेल्या व्याख्येमध्यें आणखी एक मोठा दोष आहे. तो हा कीं या व्याख्येच्या योगाने अर्थशास्त्राचीं सांगितलेलीं निरनिराळीं अंगें ही स्वतंत्र व एकमेकांपासून वेगळीं अंगें आहेत असा भास हातो. उदाहरणार्थ संपत्तीची उत्पत्ति व वांटणी या परस्परावलंबी गोष्टी नाहींत असा या व्याख्येवरुन एखाद्य चा समज होण्याचा संभव आहे. वास्तविक पहातां अर्थशास्त्राचीं सर्व अंगें परस्परावलंबी आहेत व तीं वेगवेगळीं कधींच करतां येणार नाहींत. विवेचनासाठी त्याचा निरनिराळा विचार करणें अवश्य असलें तरी संपत्तीचीं हीं अंगें अगदीं एकमेकांत निगडित झाली आहेत, हें नेहमीं ध्यानांत ठेविलें पाहिजे. अर्थशास्त्राच्या वरील व्याख्येमधले दोष अर्थशास्त्राचा जनक जो अँड म स्मिथ त्यानें आपल्या एका व्याख्येंत टाळले आहेत. त्यानं अर्थशास्त्राची व्याख्या गुणागमावरून केलेली आहे व म्हणून ती तर्कशास्त्राच्याही नियमानुरूप आहे. यामुळे पुष्कळ आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनीं सुद्धां ती मान्य केली आहे. अर्थशास्त्राच्या अॅडम स्मिथनें दिलेल्या प्रमेयापासून भिन्न अशी दुसरी कितीही प्रमेयें व तत्वें हल्ली पुढ़ें आलीं असलीं तरी अॅडम स्मिथनें केलेलें या शास्त्राचं लक्षण अजूनही कायम आहे. व जरी हें शास्त्र आणखी कितीही वाढलें तरी या व्याख्येमध्यें कांही फरक होण्याचें कारण नाहा.

"राष्ट्राच्या संपत्तीचें खरें स्वरुप व त्याच्या उत्पत्तींचीं कारणें याचें विवेचन करणारे शास्त्र ते अर्थशास्त्र होय" ही व्याख्या गुणागमानुरूप आहे हें उघड दिसून येईल. अॅडम स्मिथनें अर्थशास्त्राला व्यवस्थित स्वरूप देऊन त्याचें एक शास्त्र बनविल असें म्हणतात तें ह्या व्याख्येवरूनही सिद्ध होतें. ही व्याख्या इतर शास्त्रांच्या व्याख्येप्रमाणें सर्व शास्त्रांच्या रहस्याला अनुरूप अशीच आहे. कला व शास्त्र यांमध्यें भेद दाखवितांना शास्त्राचें रहस्य सांगण्यांत येते. कला म्हणजे कांहीं एक विषयाचें व्यावहारिक ज्ञान व त्या ज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोगाचे नियम होत. परंतु शास्त्र हें एखाया विषयाची उपपत्ति किंवा मीमांसा करतें. म्हणजे त्या विषयाचें खरें स्वरुप व त्याचीं कारण ही शोधून काढतें. तेव्हां यथार्थ स्वरूपज्ञान व कारणमीमांसा हे शास्त्राचे विशेष गुण आहेत. तेव्हां, अर्थशास्त्र हें जर शास्त्र 
[३५]

असेल तर त्यामध्येंही हे गुण असले पाहिजेत. व अर्थशास्त्र हें राष्ट्रीय संपत्तीचें शास्त्र आहे असें अॅडम स्मिथनें त्याचें विशिष्ट स्वरूप सांगितलें आहे. ज्याप्रमाणें वीज हें काय आहे व तिचीं कारणें काय आहेत हें शोधून काढणें विद्युत्शास्त्राचें काम आहे; उष्णतेचें खरें स्वरूप व तिचीं कारणें शोधून काढणें हें उष्णता शास्त्राचें काम आहे; किंवा जीवाचें यथार्थ स्वरूप व त्याचीं कारणें शोधून काढणें हें प्राणिशास्त्राचें काम आहे; त्याचप्रमाणें राष्ट्रीय संपत्तीचें यथार्थ स्वरूप व तिचीं कारणें शोधून काढणें हें अर्थशास्त्राचें काम आहे. या व्याख्येवरून अर्थशास्त्र हें सामाजिक शास्त्राचा एक पोटभेद आहे हें प्रथमतः दृष्टोत्पत्तीस येतें. राष्ट्राचा किंवा देशाची किंवा एखाद्या समाजाची संपत्ति-निव्वळ व्यक्तीची नव्हे-म्हणजे काय व ती देशांत किंवा राष्ट्रांत उत्पन्न कोणत्या कारणांनीं होते, याची मीमांसा करणें हें या शास्त्राचें काम आहे. अॅडाम स्मिथची ही व्याख्या व मागें दिलेली व्याख्या ह्यांमध्यें शेवटीं कांहीं फारसा फरक रहात नाहीं हें रवरें. अर्थशास्त्राची उत्पत्ति, वांटणी व अदलाबदल किवा विनिमय हीं जीं अंगें त्या सर्वांचा विचार अॅडम स्मिथनें आपल्या पुस्तकांत केला आहे. परंतु संपत्तीच्या कारणांचें विवेचन करतांना संपत्तीची वांटणी व तिचा विनिमय हीं अर्थशास्त्राचीं अंगें ओघानेंच येतात. हें अंडाम मिथ यानें दाखविलें आहे. म्हणजे विवेचनाच्या सोयीकरितां अर्थशास्त्रग्रंथाचे उत्पत्ति, वांटणी व विनिमय असे जरी तीन भाग करणें इष्ट असलें व त्याप्रमाणें सर्व ग्रंथकारांनीं केलेले आहेत; तरी पण व्याख्येमध्यें त्याचा अंतर्भाव करणें रास्त नाहीं. व्याख्येवरून शास्त्रविषय कसा एकरूप असून त्याचीं सर्व अंगें कशीं परस्पर संलग्न आहेत हें दिसून आलें पाहिजे
. वरील विवेचनावरून अॅडम स्मिथनंच दिलेली व्याख्या दोषरहित असून तिच्या योगानें अर्थशास्त्राचें स्वरूप चांगल्या तऱ्हेनें स्पष्ट होतें. म्हणून हीच व्याख्या सर्वमान्य होण्यास व या शास्त्राची कायमची व्याख्या होण्यास योग्य आहे असें वाचकांस दिसून आल्याखरीज राहणार नाहीं.

आतां अर्थशास्त्रासंबंधीं आणखी एक वादग्रस्त प्रश्न राहिला. तो समजण्याकरितां आपल्याला थोडेसें तर्कशास्त्रामध्यें शिरलें पाहिजे. तर्कशास्त्रज्ञांनीं अनुमानें दोन प्रकारचीं आहेत असें सांगितलें आहे, एक अनुभवसिद्ध अनुमान व दुसरें तर्कसिद्ध अनुमान. पहिल्यामध्यें आपण
[३६]


     ग करितों किंवा जे अनुभव घेतों त्यांवरून एक तत्व किंवा प्रमेय किंवा सत्य सिद्ध करावयाचें असतें. ज्याप्रमाणें प्राणवायु व हैद्रोजनवायु हे दोहोंस एक या प्रमाणांत मिसळण्याचा प्रयोग करून व त्यापासून पाणी उत्पन्न होतें हें पाहून पाणी हा संयुक्त पदार्थ आहे हें प्रमेय आपण काढतों. याला अनुभवसिद्ध अनुमान म्हणतात; व ज्यामध्यें एक स्वयंसिद्ध तत्व किंवा अनुभवसिद्ध तत्त्व यापासून दुसरें एक सत्य तर्कपद्धतीनें काढलें जातें त्याला तर्कसिद्ध अनुमान म्हणतात. या भेदावरूनच शास्त्रामध्येंही दीन मुख्य भेद मानतात. एक अनुभवप्रधान किंवा अनुभविक शास्त्रें व दुसरी तर्कप्रधान अगर तार्किकशास्त्रें. ज्या शास्त्रांतील नवीं नवीं सत्यें किंवा विधानें निरनिराळ्या प्रयोगानें किंवा अनुभवानें सिद्ध करावीं लागतात, त्याला अनुभविक शास्त्रें म्हणतात. म्हणजे येथें प्रत्येक नवीन ज्ञान अनुभव किंवा प्रयोग यावरूनच काढावें लागतें. पूर्वीच अवगत असलेल्या तत्वापासून नुसत्या विचारशक्तीनें दुस-या विधानाची सिद्धता करतां येत नाहीं. परंतु कांहीं शास्त्रांमध्यें तर्कानुमान हेंच प्रधान असतें. म्हणजे या शास्त्रांना प्रयोगाची व अनुभवाची गरज लागत नाहीं. यामध्यें नवीन विधानें किंवा सत्यें पूर्वी अवगत असलेल्या तत्वांपासून निवळ तर्कपद्धतीने काढता येतात .या कोटीमधील प्रमुख शास्त्रें म्हणजे गणितशास्त्राच्या सर्व शाखा होत. यांतील सत्यें तर्कसिद्ध असतात. त्या शास्त्रांना प्रयोग किंवा अनुभव लागत नाहीं. भूमितीचे सर्व सिद्धांत किंवा सत्यें त्या शास्त्रांतील व्याख्या, स्वयंसिद्धतत्वें व गृहीत पदें या तीन जातीच्या मूळ तत्वांपासून तर्कानें काढतां येतात. असा प्रकार प्राणिशास्त्रांत किंवा रसायनशास्त्रांत शक्य नाहीं.
आतां अर्थशास्त्राबद्दल वादग्रस्त प्रश्न असा आहे कीं, या शास्त्राची नवीन सिद्धांत काढण्याची पद्धति कोणती? अर्थात् हें शास्त्र अनुभवप्रधान आहे कीं तर्कप्रधान आहे. उपोद्धातावरून हा वाद आतां शुष्कवाद आहे असें दिसून येईल. कारण प्रत्येक शाखामध्यें निरनिराळ्या ठिकाणीं निरानराळ्या पद्धतीचा अवलंब केली जातो. उपोद्धातामध्यें जो अभिमत पंथ सांगितला आहे त्या पंथानेंच अर्थशास्त्र हें एक तर्कसिद्ध शास्त्र आहे असें एककल्ली मत दिलें. याचा स्वाभाविक परिणाम असा झीलों कीं, ऐतिहासिक पंथ निघून त्यानें अर्थशास्त्र हें अगदीं अनुभव.
[३७]
}

सिद्ध शास्त्र आहे असें ठरविण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्र हें समाज शास्त्राचा पोटभेद आहे व समाजशास्त्र हें अनुभवसिद्धशास्त्र आहे. त्याअर्थी अर्थशास्त्रही अनुभवसिद्धशास्त्र आहे हें उघड होतें. परंतु या शास्त्रामध्यें तर्कानें कोणती गोष्ट सिद्ध होत नाहीं किंवा करीत नाहीं असें मात्र नाहीं. या शास्त्राच्या कांहीं कांहीं भागांत तर्कपद्धतीचा अवलंब करणें सोयीचें असतें; तर कांहीं भागांत अनुभव किंवा प्रयोगपद्धतीचा अवलंब करणें इष्ट असतें. अर्थशास्त्राचा जनक अॅडम स्मिथ यानें आपल्या प्रख्यात ग्रंथांत दोन्हीही पद्धतींचा लागेल तसतसा उपयोग केला आहे; व हेंच करणें सयुक्तिक आहे. अॅडम स्मिथ याच्या पुढील जे ग्रंथकार झाले त्यांनीं मात्र अनुभवपद्धति पुष्कळ ठिकाणीं टाकून दिली व रिकार्डो यानें तर या शास्त्राला गणितशास्त्रासारखे तार्किक स्वरूप दिलें. रिकार्डोच्या या करण्यानें तर या शास्त्राबद्दल बराच गैरसमज उत्पन्न झाला. तेव्हां या वादांतलें तथ्य म्हणजे अर्थशास्त्र हें प्राधान्येंकरून अनुभवसिद्ध शास्त्र आहे, परंतु त्याच्या पुष्कळ भागांत तर्कपद्धतीचाही उपयोग होतो. म्हणून या शास्त्राच्या दोन्हीही पद्धति आहेत असें म्हटलें पाहिजे.