Jump to content

पोशिंद्याची लोकशाही

विकिस्रोत कडून



पोशिंद्यांची लोकशाही



शरद जोशी




जनशक्ती वाचक चळवळ

  प्रकाशकाचे मनोगत


 शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त समग्र लिखाण प्रकाशित करण्याचा प्रकल्प जेव्हा हाती घेतला. त्यावेळी राजकीय लेखांची संख्या इतकी जास्त असेल असं वाटलं नव्हतं. शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका सगळ्यांत जास्त टीकेची बळी पडली. त्यावर एक छोटीशी पुस्तिका (१९९४) अजित नरदे यांनी मोठी मेहनत घेऊन प्रकाशित केली होती. त्यामध्ये शेतकरी संघटनेच्या अधिवेशनांमधील राजकीय ठरावांचा समावेश होता. स्वतः शरद जोशी यांनी केलेलं लिखाण समाविष्ट नव्हते. स्वतंत्र भारत पक्षाच्या संदर्भात केलेले लिखाण आणि त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीचं केलेलं विश्लेषण या सगळ्यांमधून एक अतिशय प्रगल्भ सर्वव्यापी आणि देशाचा मूलभूत विचार करणारी अशी मांडणी समोर येते. हे सर्व लेख एकत्र असणे आम्हाला आवश्यक वाटले. अभ्यासकांनी हे लिखाण डोळसपणे अभ्यासले, तर शेतकरी संघटनेच्या राजकीय भूमिकेबाबत जी अकारण आणि अप्रस्तुत टीका केल्या गेली, ती चूक आहे हे लक्षात येईल. आम्ही नियोजिलेला समग्र शरद जोशी प्रकाशनाचा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण होत आहे. नजर चुकीने काही लेख राहून गेले असतील, तर ते पुढील आवृत्त्यांमध्ये समाविष्ट केले जातील. सर्वसामान्य वाचकांनी या आधीच्या चौदा पुस्तकांना अतिशय चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमधून आणि विविध नियतकालिकांतून या पुस्तकांवर परीक्षणं प्रकाशित झाली त्या सर्व संपादकांचे आभार.


श्रीकांत अनंत उमरीकर

लेखानुक्रम
०१ आढावा दहा वर्षांच्या राजकारणाचा ०९
०२ लोकसभेची मध्यावधी निवडणूक आणि शेतकरी संघटना १७
०३ 'भारत'भूमीला वाफसा आला आहे २९
०४ पाटी पुसली, आता पुढे ३९
०५ मागणं लई नाही ४५
०६ मध्यममार्गी पंतप्रधान ४९
०७ स्वतंत्र भारताचे नैतिक दर्शन ५६
०८ काँग्रेसला पर्याय नाही? ६३
०९ लोकसभा निवडणुका १९८९ ७२
१० अपात्र नेत्यांनी मांडलेली जनतेची अग्निपरीक्षा ७८
११ पंचायत राज निवडणुका व शेतकरी महिला आघाडी ८४
१२ देशाला वाचविण्यासाठी ९२
१३ खाईच्या धारेवर असलेल्या देशातील जनतेला धोक्याचा इशारा १०५
१४ खाईच्या धारेवर, मतपेटीच्या समोर! १११
१५ इति अटलबिहारी प्रकरणम् १२१
१६ नाही, पंतप्रधानसाहेब! १२८
१७ कांदाफेकीचे मर्म १३१
१८ मेंढरे नव्हे, माणसे म्हणून जगा १४०
१९ संकटाची चाहूल देणारा जाहीरनामा
(स्व. भा. प. जाहीरनामा लेखांक: १) १४८
२० स्थिर सरकार चांगले की आघाडीचे?
(स्व. भा. प. जाहीरनामा लेखांक : २) १५४
२१ राखीव जागांविषयी भ्रम (स्व. भा. प. जाहीरनामा लेखांक : ३) १६२
२२ स्त्रियांसाठी राखीव जागा (स्व. भा. प. जाहीरनामा लेखांक : ४) १७०
२३ समान नागरी कायदा (स्व. भा. प. जाहीरनामा लेखांक : ५) १७९
२४ समाजवादी संरचना (स्व. भा. प. जाहीरनामा लेखांक : ६) १८८
२५ स्वातंत्र्यलढ्याच्या फौजेची पुनर्बाधणी करताना १९१
२६ खरोखरी स्वातंत्र्याचा जाहीरनामा २०४
२७ बहुजन समाजाला क्रांतीची दुसरी संधी २११
२८ पोशिंद्यांच्या लोकशाहीसाठी स्वतंत्र भारत पक्ष २१९
२९ ग्यानबाचे मतदारांना मार्गदर्शन
(लोकसभा निवडणूक २००४) २३४
३० खुलेपणाचा दरवाजा उघणारे 'अटलजीं'चे बटण २४९
३१ २००४ निवडणुकीने काय शिकविले? २५९
३२ देशाच्या स्वातंत्र्यास कोयता-पंजाचा धोका २७२
३३ निवडणूक धोरणाचा निर्णय लॉटरी तिकीट घेण्यासारखा होत नाही २७७
३४ होतकरू नव्हे, खचलेल्या मनांचा कौल
(म. रा. विधानसभा २००४ निकाल) २८८
३५ राजकीय भूमिकेचे चक्रव्यूह २९३
३६ राष्ट्रीय 'रालोआ' आणि राष्ट्र संपवणारी 'संपुआ' ३०६
३७ आता देश वाचविणे फक्त मतदारांच्या हाती ३२२
३८ गरिबांच्या खच्चीकरणाविरुद्ध आचारसंहिता कोणती? ३३७
३९ देशपातळीवरील निकालाचा अर्थ
(लोकसभा निवडणूक २००९) ३४४