Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४१ )

र्नर जनरल हिंदुस्थानांत नेमून पाठविते वेळीं कंपनीचे दायूरेक्तर ( व्यवस्थापक ) ह्यांचाहि त्याला सक्तीचा हुकूम असे कीं, त्यानें मागील गव्हर्नर जनरलांप्रमाणे लढायांत बिलकूल पडूं नये. तसेंच तो गव्हर्नर जनरल इंग्लंदांतून निघते वेळी ह्याप्रमाणें शांतता राखण्याचें अभि वचना देई; परंतु हिंदुस्थानांत आल्यावर थोड्याच दिवसांनी त्याला लढायांत पडावे लागे.
 असें कां होई, हें स्पष्ट होण्यासाठी एक सोपें उदाहरण घऊं. कल्पना करा कीं, १० घरांची एक कंपनीच्या लढा- आळी आहे, व त्या आळीतील नंबर १ च्या यांचीं कारणें. घरांत तुम्ही राहत आहां; नंबर ९च्या किंवा १०च्या घरास आग लागली; तुमच्या घराच्या बाजुला वारा वाहूं लागला नाहीं, तोंपर्यंत तुम्हांला त्याजबद्दल फारशी काळजी बाळगावयास नको. परंतु कल्पना करा कीं, नंबर २च्याच घरास आग लागली आहे; तसेंच त्या घरांतील निमे लोक ज्वाला प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करीत असून निमे त्या विझ- वून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेंहि तुम्हांला कळून आलें. ज्वाला तुमच्या घरापर्यंत खास पसरतील असे उघड दिसत आहे; आणि कसें होईल, काय होईल, ह्या भीतीमुळे तुम्हांला व तुमच्या कुटुंबांतील माणसांना नेहमींचा कामधंदा सुचत नाहींसा झाला आहे. अशा स्थितींत तुम्ही काय कराल ? उघडच आहे कीं, तुम्ही