पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११०) प्रयत्न त्यांनी चालविला होता. युरोप खंडांतील भिन्न भिन्न राष्ट्रांचा परस्परांशीं चालणारा बहुतेक व्यापार त्या काळीं डच लोक करीत असत; एका राष्ट्रांतील बंदरीं त्या राष्ट्रांत उप्तन्न होणारा माल ते विकत घेत; आणि डच लोकांबरोबर दुसऱ्या राष्ट्रांतील बंदरी नेऊन तेथें अ- धिक किमतीस विकून नफा मिळवीत; साहतीसंबंधाने ह्या युद्धे. अशा प्रकारची त्यांची व्यापाराची पद्धति होती. रीतीनें जलमार्गानें त्यांनी प्रचंड व्यापार सुरू केला हो- ता; व त्याच्या संरक्षणासाठी बलाढ्य आरमार ठेविले होतें. हा डच लोकांचा व्यापार इंग्लिशांच्या डोळ्यांत सलत होता; म्हणून तो त्यांच्यापासून हिसकावण्याची इंग्लिशांना फार इच्छा झाली. डच लोकांचा व्यापार अग दीं बुडविण्याच्या इराद्यानें “गलते जाण्यायेण्यासं बंधी कांहीं कावड़े” (नॅव्हिगेशन आक्टस) त्यांनी ठरविले. वसाहती व त्या ज्यांनी स्थापिल्या असतील ते देश ह्यांमधील व्यापार कशा रीतीने चालावा, हे त्या कायद्यांत ठरविलें होतें; व म्हणून त्यांना फार महत्त्व आले. कोण ताहि माल ज्या देशांत तयार झाला असेल त्या देशच्या गलबतांतून किंवा इंग्लंदच्या गलबतांतून मात्र तो इंग्लं दास आणावा, असा त्या कायद्यांमुळे ठराव झाला. अर्थात् ह्यामुळे डच लोकांच्या व्यापाराला विल क्षण धक्का बसला. तेव्हा ह्याबद्दल सूड उगविण्याची इच्छा त्यांना होणे साहजिकच होतें. म्हणून इंग्लंदांत