बर्क ह्याच्या वेळेपासून झाली असून हिंदुस्थानासंबंधानें तर
ही समजूत फार दृढ झाली आहे. म्हणून केवळ स्वा-
र्थासाठीं तो देश आपल्या ताब्यांत ठेवावयाचा, हा
विचार त्यांनीं अगदीं सोडून दिला पाहिजे. अमुक एक
प्रमाणापर्यंत उत्तम प्रकारची राज्यव्यवस्था आपणांस
हिंदुस्थानांत ठेवावयाची आहे, असे धोरण त्यांनी ठेविलें
आहे; आणि येथील नेटिव्ह लोकांच्या भोळ्या व वेड-
सर समजुतींत हात न घालितां पाश्चिमात्य सुधारणांपैकीं
उत्तम सुधारणा ह्या देशांत हळू हळू सुरू करण्याचा
त्यांचा मुख्य हेतु आहे. कायद्यांची समता, छापखा-
न्यांचें स्वातंत्र्य आणि विद्या, हीं त्यांनी येथील लोकांस
दिलीं आहेत; व युरोपियन लोकांच्या श्रमानें लागले-
ल्या शोधांपासून जे फायदे इंग्लिशांस होऊं लागले
आहेत, ते सर्व फायदे ( आगगाड्या, तारायंत्रे वगैरे )
त्यांनी ह्या देशांतील लोकांस करून दिले आहेत.
तेव्हां इंग्लिश लोकांच्या बुद्धिसामर्थ्यामुळे, त्यांच्या स्वार्थ-
पराङ्मुखतेमुळे आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे हिंदुस्थानांत
ज्या ह्या अनेक सुधारणा झाल्या आहेत, त्या जर त्यांनी
बुद्धिपुरःसर रानटी व जुलमी रशियन लोकांच्या स्वाधीन
केल्या, किंवा ह्या देशांतील झोटिंग पातशाही, दरोडें,
दंगेधोपे, ह्यांच्या गडबडींत सोडून दिल्या, तर इतिहासांत
त्यांच्याविषयी काय उद्गार निघतील ?
हा देश सोडून देणे किंवा आपल्या हातून