पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७९)

एकंदर जमीन आहे, तिच्यापैकीं फारच थोड्या भागाची हल्लीं लागवड होत आहे. कांहीं प्रांता- पाट बंधाऱ्यांची आवश्यकता. तून तर लागवड जमिनीच्या ७ पट लाग- वड होण्यासारखी जमीन पडीत राहिलेली आहे. प्रायः हें प्रमाण ३ : १ आहे; म्हणजे लागवड जमिनीच्या तिप्पट पडीत जमीन आहे; व सिंधुनदीच्या कांठचा सुंदर मळईचा भाग अद्यापि देखील पडीत राहिला आहे. अशा प्रकारें जमीन पडीत राहण्याचें मुख्य कारण पाण्याची कमताई. इंग्लंदांत तेथील शेतकरी पाणी पुष्कळ म्हणून ओरडतात, हिंदुस्थानांत कमी म्हणून आरेडतात. हिंदुस्थानांत कोठें कोठें पाऊस फार कमी पडतो; म्हणून पिकांना केव्हां केव्हां पाटाच्या पाण्यावरहि अवलंघून रहावें लागतें.

 ह्या गोष्टीच्या महत्त्वाची थोडी बहुत कल्पना करितां यावी, म्हणून ईजिप्त देशाची स्थिति लक्षांत ह्या संबंधानें इंजित देशा- चें उदाहरण. आणा. सुपीकपणाविषयीं त्या देशाची नेहमीं प्रसिद्ध आहे. परंतु नैल नदीचें पाणी पाट बंधाऱ्यांनी जेथपर्यंत नेतां येतें, तेथपर्यंतच काय ती तेथील जमीन सुपीक असते. ईजिप्तमध्ये पाटबंधाऱ्यांचें काम शेकडों वर्षे सुरू आहे; हिंदुस्थानांत त्या कामास नुकताच आरंभ झाला आहे, असे म्हटले तरी चालेल. ही गोष्ट जास्त स्पष्ट करून सांगण्यासाठी इ. स. १८०५ च्या " नाई