पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७७ )

वाटलेंहि आहे." म्हणजे युनायतद स्तेत्समधील गव्हांच्या •पिकास जर जबर धक्का बसला, किंवा इंग्लंदांत व त्या संस्थानांत जर लढाई उत्पन्न झाली तर हिंदुस्थानांतून इंग्लिशांस गव्हांचा फारच मोठा पुरवठा होईल. हा देश जोपर्यंत त्यांच्या ताब्यांत आहे, व सुएझचा कालवा जोपर्यंत जाण्या येण्यास खुला आहे, तोपर्यंत भाकर महाग होण्याची भीति बाळगिण्याचें इंग्लिशांस कारण नाहीं, असे म्हटले असतां त्यांत कांहीं अतिशयोक्ति नाहीं.

 गेल्या पांच वर्षांत साधारणपणे पाहिले असतां व्यापार जरी विशेष जोरावर नव्हता, तरी देखील इंग्लि- शांनीं हिंदुस्थानांत जो माल पाठविला, त्याचें प्रमाण त्या मुदतींत फार वाढले आहे. पांच वर्षांत त्यांचा कापडाचा व्यापार नें वाढला, आगगाडीचें सामान दीडपट खपूं -नें लागलें,लोंकरीच्या जिनसांचा व्यापार ने वाढला, आणि बूट व जोडे पूर्वीच्या जवळ जवळ दुप्पट खपूं लागले.

 हिंदुस्थानाशीं त्यांचा व्यापार आजपर्यंत कोणत्या प्रमाणानें चालत आला आहे, ह्याचा आतांपर्यंत आपण विचार केला. आतां ह्याच्या भावी स्थितीचा विचार करूं.

 एतद्देशीय लोकांस ज्या वस्तूंची गरज लागेल त्याच वस्तु इंग्लिश लोक विकणार हे उघडच आहे. म्हणून ब्रिटिश व्यापाराची भावी स्थिति हिंदु- स्थानच्या सुधारणेवर अवलंबून आहे. हिंदुस्थानच्या स्थितीची सुधा- रणा.