पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६७ )

मुळींच नाही; व ह्यामुळे ज्यांच्या जमिनी नाहींत, परंतु जे व्यापारी किंवा सावकार आहेत, त्यांच्यापासून सरकारच्या तिजोरींत फारच थोडा पैसा जातो.
 हिंदुस्थानांतील सैन्यास ३ धोक्यांच्या संबंधानें सावधगिरी ठेवावी लागते; ( १ ) नेटिव्ह संस्थानिकांचें त्यांच्या ३,८०,००० सैन्यासह बंड;(२) ब्रिटिश हिंदुस्थानांतच बंडाचा उद्भव; व (३) परराष्ट्राची स्वारी. ज्याच्या संबंधानें हल्लीं फार भीति आहे, तो ३रा धोका होय; कारण परराष्ट्राची मदत आल्याशिवाय पहिले दोन
ह्या देशाचें धोके येण्याची हलीं फारशी भीति नाहीं. इंग्लिशांना मोठी भीति
संरक्षण.  काय ती रशियाची आहे. रशियन लोकांना हल्ला करणें झालें तर अफगाणिस्थानांतील दोन रस्त्यांपैकीं कोणत्या तरी रस्त्यानें केला पाहिजे. पहिला रस्ता काबुल व खैबर खिंडीमधून, व दुसरा कंदहार व क्वेटावरून. ह्या दोहोंतून कोणत्याहि रस्त्यावर आपलीं सैन्यें आपणांस त्वरित गोळा कारतां यावीं, हा हिंदुस्थान सरकारचा हल्लींचा मुख्य हेतु आहे; व म्हणून हिंदुस्थानांतील मोठमोठ्या रेलवेच्या रस्त्यांची अशी व्यवस्था केलेली आहे कीं, तिच्या योगानें कलकत्ता, मद्रास व मुंबई ह्यांचा ह्या सरहद्दीशीं निकट संबंध जोडिला गेला आहे. तसेंच सिंधु नदीच्या मुखापाशीं असणा-या कराची शहरापासून खैबर खिंडीशी असलेल्या पेशावर शहरापर्यंतहि रेलवे रस्ता केला आहे;