पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५८)

अशी जी पुरातन समजूत आहे, तींत पुष्कळ तथ्य आहे. तसेंच ब्रिटिश वसाहतींत त्या लोकांचा अंमल सुरू होण्या- पूर्वी त्या इतर राष्ट्रांतल्या मालापेक्षां ब्रिटिश माल कमी घेत; परंतु हल्लींहि कमीच घेतात, असे मानण्यास कांहीं आधार नाहीं, असें मार्गे दाखविलेंच आहे. शिवाय सर्व ब्रिटिश राष्ट्राचे ब्रिटिश लोक प्रमुख आहेत; व हा संबंध- हि व्यापाराच्या बाबतींत त्यांना फारच हितावह आहे. जोपर्यंत त्यांच्याकडे हें वरिष्ठपणाचें नाते आहे, तोपर्यंत वसाहती त्यांचा माल घेणारच. इंग्लंदांतील रितीभाती व पोषाख ह्यांचें अनुकरण इतर सर्व ठिकाणचे इंग्लिश लोक करणारच; आणि जर कांहीं कारणांमुळे त्यांची सत्ता वसाहतींना अप्रिय झाली तर त्या त्यांच्या हातून जातील, व त्यांचें फार नुकसान होईल.

 सारांश, वरील एकंदर विवेचनावरून पुढे लिहि- ल्याप्रमाणे गोष्टी ठरतात :- [१] परमुलखी रवाना करण्यासाठी ब्रिटिश लोक जितका माल तयार करितात, त्याच्या शापेक्षां अधिक माल खुद्द त्यांच्या वसाहती व हिंदुस्थान ह्यांच्यांतच खपतो; [ २ ] पररा- ष्ट्रांत दर माणशीं जितका त्यांचा माल खपतो, त्यापेक्षां ह्या त्यांच्याच ताब्यांतील मुलखांत किती तरी अधिक खपतो;[३] त्यांच्या ताब्यांतील मुलखांत होणारा त्यांच्या मालाचा हा खप, पृथ्वीवरील इतर देशांत होणाऱ्या खपाशीं ताडून पाहतां, फारच सपाट्यानें वाढत चालला