होतें, व त्या सर्व कुटुंबाच्या चरितार्थाचा बोजा त्याच्या
वरच होता. आतां त्याने काय करावें बरें ? त्याने
असे केलें; पैसा कर्जी काढिला; व तो पैसा त्या दुसऱ्या
लोकांत देऊन त्यांच्यापासून ते जमिनीचे तुकडे त्यानें
विकत घेतले. ह्याचा परिणाम असा झाला कीं, कांहीं
काळपर्यंत त्याच्या शिरावर त्या कर्जाचा बोजा पडला;
परंतु तें कर्ज फेडण्याची त्याला उमेद होती. ह्याप्रमाणें
तें फेडिल्यानंतर त्याला असें आढळून येईल की, आप-
णास उत्तम प्रकारचे वतन मिळाले आहे, व आपण
पूर्वीपेक्षां फार श्रीमान् झालो आहों.
आतां हेंच उदाहरण विशेष मोठ्या प्रमाणावर
ध्यानांत आणावें, व त्याप्रमाणेच इंग्लिशांनी हुबेहुब के-
लें, असे समजावें. आपल्या वतनाचे ( वसाहतींचे )
तुकडे होतील, अशी त्या काळी त्यांना मोठी भीति
होती, त्यांचे कुटुंबहि मोठें होतें ( इंग्लंदांतील सर्व लोक
हेंच कुटुंब. व तेथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत
चालल्यामुळे ह्या वाढणाऱ्या लोकसंख्येच्या चरितार्थाची
कांही तजवीज होणें जरूर होतें. ) ; आणि हं वतन
एकत्र राखण्यासाठी व ते वाढविण्यासाठी त्यांनी पुष्कळ
पैसा खर्च केला व कर्जीहे काढिला. तेव्हां राष्ट्रदृष्टया
ह्या जमाखर्चाचा विचार करणे म्हणजे जमेच्या व खर्चा-
च्या सदरांची तुलना करून एकंदरींत आपला नफा
झाला किंवा तोटा झाला, इतके पाहणें हेंच आहे.