इतर राष्ट्रांनी स्थापिलेल्या नवीन वसाहती जिंकण्यासाठी
लढण्याची सुरवात केली. बरीच वर्षे इंग्लिशांच्या आर-
माराचें प्राबल्य वाढत चालले होतें; व म्हणून कामवेलानें
स्पेन देशाशीं उघडपणें लढाई सुरू केली; आणि जमेका
बेटावर आरमार पाठवून तें स्पेन देशांतील लोकांपासून
त्यानें घेतलें. तें तेव्हांपासून इंग्लिशांच्याच ताब्यांत आहे.
युरोपांतील लढायांतून आतांपासून कांहीं विशेष
प्रकारचा फेरफार दिसून येऊं लागला. तेव्हांपासून
वाटच्या लढाईपर्यंत ( १८१५ पर्यंत ) इंग्लिशांनी
ज्या ज्या लढाया केल्या, त्या त्या लढायांत त्यांचा मु
ख्य उद्देश म्हटला म्हणजे, आपल्या प्रतिपक्ष्यांच्या वसा-
हती घेणें, व त्यांचें ह्याप्रमाणें नुकसान करून आपल्या
वसाहतींचा विस्तार वाढविणें, एवढाच मुख्यत्वें करून
होता. ह्या प्रकारचें आचरण करण्यास त्यांना नीति-
दृष्ट्या अधिकार होता किंवा नाहीं, हा प्रश्न स्वतंत्र आहे;
तथापि १८१४ पर्यंत त्यांनी मिळविलेल्या बहुतेक वसा-
हती त्यांनी इतर राष्ट्रांपासून हिसकावून घेतल्या आहेत,
इतकी गोष्ट निर्विवाद आहे.
इतर राष्ट्रांचे नुकसान करून आपल्या वसाहती
वाढविण्याचा प्रयत्न इंग्लिशांनी चालविला, तेव्हां त्या
प्रयत्नाबरोबरच त्या वसाहतीतील जितका व्यापार आप-
ल्या हाती आणितां येईल तितका आणण्याविषयींहि
१०