पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०९)

इतर राष्ट्रांनी स्थापिलेल्या नवीन वसाहती जिंकण्यासाठी लढण्याची सुरवात केली. बरीच वर्षे इंग्लिशांच्या आर- माराचें प्राबल्य वाढत चालले होतें; व म्हणून कामवेलानें स्पेन देशाशीं उघडपणें लढाई सुरू केली; आणि जमेका बेटावर आरमार पाठवून तें स्पेन देशांतील लोकांपासून त्यानें घेतलें. तें तेव्हांपासून इंग्लिशांच्याच ताब्यांत आहे.

 युरोपांतील लढायांतून आतांपासून कांहीं विशेष प्रकारचा फेरफार दिसून येऊं लागला. तेव्हांपासून वाटच्या लढाईपर्यंत ( १८१५ पर्यंत ) इंग्लिशांनी ज्या ज्या लढाया केल्या, त्या त्या लढायांत त्यांचा मु ख्य उद्देश म्हटला म्हणजे, आपल्या प्रतिपक्ष्यांच्या वसा- हती घेणें, व त्यांचें ह्याप्रमाणें नुकसान करून आपल्या वसाहतींचा विस्तार वाढविणें, एवढाच मुख्यत्वें करून होता. ह्या प्रकारचें आचरण करण्यास त्यांना नीति- दृष्ट्या अधिकार होता किंवा नाहीं, हा प्रश्न स्वतंत्र आहे; तथापि १८१४ पर्यंत त्यांनी मिळविलेल्या बहुतेक वसा- हती त्यांनी इतर राष्ट्रांपासून हिसकावून घेतल्या आहेत, इतकी गोष्ट निर्विवाद आहे.

 इतर राष्ट्रांचे नुकसान करून आपल्या वसाहती वाढविण्याचा प्रयत्न इंग्लिशांनी चालविला, तेव्हां त्या प्रयत्नाबरोबरच त्या वसाहतीतील जितका व्यापार आप- ल्या हाती आणितां येईल तितका आणण्याविषयींहि
१०