पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७२)

माणसांस येथील हवा वाईट असून लहान मुलांस तर घातकच आहे. म्हणून इतर वसाहतींपासून असलेल पहिला फायदा हिंदुस्थानापासून त्यांना मुळींच नाहीं, असे म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं.

 तर मग दुसरा फायदा तरी आहे किंवा कसें, त्याचा विचार करूं. हिंदुस्थानामुळे त्यांच्या सामर्थ्यात भर पडत आहे काय ? पडते, असें म्हणतां येईलसें दिसत नाहीं. माल्टा व सौदन येथे हिंदुस्थानांतील सैन्य मदतीस आणिलें होतें, व त्यामुळे इंग्लिशांना यश येऊ- न त्या त्या ठिकाणीं त्यांचें सामर्थ्य वाढले असें, ह्या संबं धानें कदाचित् कोणी म्हणतील, परंतु ही गोष्ट क्षुल्लक आहे. हिंदुस्थानांतील एकून एक शिपाई त्यांना कधीं- हि काढितां येणार नाहीं. इतर वसाहतींचें असें नाहीं. त्या त्यांचे स्वतःचें संरक्षण करितात, व प्रसंगी इंग्लि- शांसहि मदत करितात, ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे, हिंदुस्थानापासून त्यांच्या सामर्थ्यांत भर पडत नाहीं एव देंच नाहीं, तर हिंदुस्थान ताब्यांत आहे म्हणून पररा: प्ट्रसंबंधी राजकारस्थानांच्या बाबतींत त्यांना वारंवा मोठी काळजी उप्तन्न होते; आणि रशिया, ईजिप्त तुर्कस्थान ह्या देशांशीं त्यांचे वारंवार बखेडे पडतात हिंदुस्थान ताब्यांत नसते तर त्यांना ह्या बखेड्यांचं जरूर नव्हती. सारांश इतर वसाहतींपासून होणार दुसरा फायदाहि ह्या देशापासन त्यांना होत नाहीं.