पुस्तकप्रकाशनाच्या बाबतीत हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. आमच्या वाचकवर्गाने मनापासून साहाय्य केले तर त्यांच्या द्रव्याचा मोबदला त्यांस चांगल्या पुस्तकांच्याद्वारे देण्याची आह्मी शक्य तितकी खबरदारी घेऊ. मराठी वाङ्मयांत चांगल्या ग्रंथांची भर पडण्यासाठी कायावाचामनाने झटण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही असे आश्वासन देतो. अनेक कारणांमुळे प्रसिद्ध केलेल्या मुदतींत हा खंड वाचकांच्या हाती आह्मांस देतां आला नाही, याबद्दल आझी दिलगिर आहों. तथापि अनेक अपरिहार्य अडचणींची शिळी झालेली सबब पुढे न करतां प्रांजलपणे वाचकांची क्षमा मागून यापुढे अधिक नियमितपणा दाखवावा हे बरें. पुढील खंड जानेवारीच्या पहिल्या आठवड्यांत वाचकांस मिळेल.
प्रस्तुत पुस्तक फार घाईने छापावें लागल्यामुळे त्याच्या छपाईत व बांधणीत काही दोष असतील ते पुढे राहूं नयेत याबद्दल शक्य तितकी खबरदारी आह्मी घेऊ.
आमच्या या यत्नांत उदारबुद्धीने साहाय्य करण्यास व मनोभावें आह्मीं केलेली सेवा गोड करून घेण्यास आमच्या प्रिय वाचकवर्गास विनंति करून त्यांची सध्या रजा घेतो.
मुंबई, ता. १५ सप्टेंबर ।
१९१२.
प्रकाशक.