पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकरणात या सर्वांचे वास्तव जैनेंद्रकुमारांनी वर्णिलेले आहेच. त्यांत त्यांनी काँग्रेस, विरोधी पक्ष, कम्युनिस्ट, हिंदुत्ववादी - उजवे-डावे सर्व पक्ष व त्यांचे नेते याबाबत सविस्तर ऊहापोह केला आहे. त्यातून जैनेंद्रकुमारांचा भारतीय राजकारणाचा खोल व्यासंग होता, हे कळून चुकते.

भाषिक प्रश्न

 भारताच्या एकात्मतेची सारी मदार इथल्या वैविध्यावर आधारित आहेत. त्यातही भाषेचा प्रश्न नाजूक आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने भाषावार प्रांतरचनेचे धोरण अवलंबिले. त्यात हिंदी, उर्दू, पंजाबी, इंग्रजी अशा भाषा नि राष्ट्रभाषेचे धोरण यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्या वादाचे स्वरूप उत्तर विरुद्ध दक्षिण भारत होते. भाषिक अस्मिता राजकीय हत्यार बनल्याच्या त्या काळात तत्कालीन शासनाने राजकीय अधिकारांच्या जोरावर प्रांतरचना केली. विरोधानंतरही भारत एक आहे. त्याचे गमक, रहस्य येथील सांस्कृतिक एकतेत आहे. जैनेंद्रांनी म्हटले आहे की, ‘सांस्कृतिक ऐक्य का यही लक्षण है। वह एकता एकरूपता नहीं माँगती।" (पृ.२९६) म्हणत जैनेंद्रकुमारांनी वैविध्याचं महत्त्व अधोरेखित केले आहे. जागतिकीकरणाने येणा-या सपाटीकरणाच्या पुढे याच वैविध्याचे, ते टिकून धरण्याचे आव्हान आहे. येथील हिंदी-उर्दू भाषावाद त्याला धार्मिक किनार लाभली आहे. त्यामागेही येथील हजारो वर्षांचा राजकीय इतिहास आहे. इंग्रजीचा घटनेतील स्वीकार, त्यामागे तत्कालीन परिस्थिती व वैश्विक भान आहे खरे. पण स्वभाषा विकासाचे प्रश्न त्यामुळे मागे पडले. जैनेंद्रांनी पंजाबी भाषेचा प्रश्न एकदम वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. त्या भाषेपुढे सीमारक्षणाचा यक्षप्रश्न आहे. हिंदी साहित्यिक डॉ. प्रभाकर माचवेंनी पंजाबीचे वेगळेपण लक्षात आणून देताना म्हटले होते की, या प्रांतांचे स्वतःचं प्रांतगीत नाही (आमार सोनार बांगला देश, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा... सारखे). म्हणून जैनेंद्र सल्ला देतात की, “प्रश्न के राजनीतिक रूप पर आप हैरान न हों, वह बहुत ऊपरी है। उसके नीचे जीवन की और संस्कृति की जो शक्तियाँ काम कर रहीं हैं, उन पर भरोसा रखिए।" (पृ. ३00). इंग्रजीला राज्यभाषा म्हणून मान्यता देण्यात चूक केली, हे ही नोंदवायला जैनेंद्र विसरत नाहीत, त्यातून आपण आपल्यातील आत्मनिष्ठेचे दारिद्र्य, आत्मनिहायताच स्पष्ट केल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

अव्यवस्था आणि गुन्हेगारी

 ‘समय और हम' ग्रंथ हा भारताच्या सांस्कृतिक प्रश्नांचा विशाल पट

साहित्य आणि संस्कृती/१५७