पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राम कैकेयीच्या महालातून निघाला, तो थेट कौसल्येकडे गेला. "देवी, तुला माहीत नाही. मोठी भयंकर आपत्ती कोसळली आहे. तुला, सीतेला व लक्ष्मणला दुःखात लोटणारी अशी ही गोष्ट आहे. महाराजांनी भरताला यौवराज्याभिषेक करावयाचे ठरविले आहे व मला वनवासात पाठविल आहे." हे शब्द ऐकिल्याबरोबरच कौसल्या बेशुद्ध झाली. रामाने तिला शुद्धीवर आणिले, तेव्हा तिने फार दुःख केले. असा प्रसंग येण्यापेक्षा एक वेळ पुत्र न झालेला पतकरला. पतिपौरूषाने मला कसलेच सुख वा कल्याण दिले नाही. आता मुलामुळे सुख मिळेल, ही आशा होती. सवतींची (दशरथाला बखळ बायका होत्या.) मर्मच्छेदक बोलणी मला जन्मभर ऐकून घ्यावी लागली. जवळ असूनही माझी अवहेलनाच होत गेली. तू गेलास, म्हणजे माश मरणच ओढवेल. आज जी चार माणसं माझ्यामागे आहेत, तीसुद्धा कैकेयाच्या पुत्रामुळे माझ्याकडे पाहीनातशी होतील. तू गेलास. तर मी मरेन व मातृमरणाला कारण झाल्यामुळे नरकात जाशील." (२.१८.२३-२८). तिचा अशी नाना त-हेची बोलणी ऐकून तिच्याइतकेच दुःख झालेला लक्ष्म म्हणाला,"रामाने वनात जावे, हे मलाही पटत नाही. राजा वृद्ध आहे. विपरीत वागतो आहे; स्त्रीबुद्धीला वश आहे. शत्रूलासुद्धा रामात दोष सापडणार नाही. मी बघतो कोण आमच्या विरुद्ध जाऊ शकेल ते? सगळ्या भरतपक्षीय मी मारून टाकतो. तू स्वस्थ राहून पहा." कौसल्येने आशेने राम पाहिले; पण राम काही केल्या ऐकेना. "माझ्या बापाची आज्ञा (वाक्य). पाळणारी अशी शक्ती नाही. मी तुझ्या पाया पडतो. मला वनात जा (परशु) रामाने बापाच्या सांगण्यावरून आईला मारिले: मग हे तर काल नव्हे. आपल्या कित्येक पूर्वजांनी अशाच शपथा घेऊन त्या पूर्ण का माझ्या प्राणांची आण! मला जाऊ दे. - लक्ष्मणा, तुझे प्रेम मला माहात ॥ पण अधर्माने, अविचाराने वागू नकोस. भरताला अभिषेक होऊ दे. मा वा गेल्याने कैकेयीला शांती लाभू दे." रामाची वचने ऐकून लक्ष्मणाच सा झाले नाही. शेवटी रामाच्या इच्छेप्रमाणे कौसल्येने मंगल आशीवाद त्याची पाठवणी केली. त्यानेही जाताना आईला सांगितले की, "मी गल्या राजा पत्रशोकाने झुरेल. त्याला त्रास होऊ नये, असे वाग" (२.२१.१९). कौसल्येने तसे केले नाही. १८ ।। संस्कृती ।।