________________
यण्याची शक्यता आहे की, थोडा वेळ समानता बाजूला सारून सत्ता केंद्रित करावी लागेल. पण असे प्रसंग जितके थोडे येतील तितके चांगले; कारण सत्तेचा लोभ हा संपत्तीच्या लोभापेक्षा समानतेचा मारेकरी ठरतो. क्रांतीच्या मार्गे समानता प्रस्थापित करण्याविरुद्ध हाच मोठा आक्षेप आहे. क्रांतीच्या काळात लहान महत्वाकांक्षी गटाच्या हातात सत्ता केंद्रित होते व विषमतेचे नवे पाश समाजाभोवती घट्ट बसतात. - सध्या कोठच्याही मानवसमाजांत वरील तीन तत्त्वे पूर्णतया किंवा पन्याच प्रमाणात दिसून येत नाहीत. सर्व मानवसमाजात ही तत्त्वे कधीकाळी अस्थापित होतील, की त्याआधीच मानवसंस्कृती व समाज ही दोन्ही नष्ट हाताल, हेही आज सांगता येत नाही. पण ही तीन तत्त्वे त्यांतल्या त्यांत कल्याणकारी धर्माची तत्त्वे म्हणून समजायला हरकत नाही. ह्या धर्माचे वारकाड मधूनमधून दिग्दर्शित झाले आहे. त्यापेक्षा जास्त तपशिलात शरण म्हणजे धर्मतत्त्वाचे व्यापकत्व घालविणे होईल. जापल्या तत्त्वज्ञानाच्या भाषेत त्याचा उच्चार करावयाचा म्हणजे 'अहं म हे तत्त्व व्यक्ती हे साधन नाही, असे सांगते; 'तत् त्वम्' म्हणजे 'मी " ह सांगते. 'सर्व खल इदं ब्रह्म' ह्यात दोन गोष्टी अनस्यत आहेत: मानतच्या लायकीचे आहेत ही एक गोष्ट, व समाजात जे-जे काही आह त्याची संपूर्ण जबाबदारी समाजावर म्हणजेच सर्व व्यक्तींवर " है। दुसरी गोष्ट. खिस्ती व मुसलमानी धर्मांत सर्व सृष्टी देवाची व वा अशी द्विधा विभागली आहे, व सैतानाच्या सृष्टीचा मुक्तीचा मार्ग सला आहे. समता, बंधुभाव व स्वातंत्र्य ह्यांचे पोषण सर्वग्राही ब्रह्मतत्त्वावरच पाहज. इतके व्यापक आत्मौपम्य असेल, तरच समानतेच्या परम धर्माचे ग्रहण होईल, एरव्ही नाही. ܀܀܀ ११९ ।। संस्कृती ।।