पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क्वचितच मिळते. जे जमीनमालक शक्तिमान आहेत ते तो कायदा खुशाल धाब्यावर बसवतात, व कुळांच्या पदरात काहीच पडत नाही. लाच खावयाला एक नवीन कुरण मोकळे झाले. तालुकावार ह्या कायद्याची नीट अंमलबजावणी करणे काही कठीण काम नाही; पण ते करण्यास लागणारा त्रास व विलंब काणी सोसावा? एक कायदा केला की फुकट मोठेपणा मिळतो, अन्यायाचे पारमार्जन केल्याचे श्रेय मिळते. तीच त-हा आदिवासी यांच्या बाबतीत. त्याना 'आदिवासी' म्हणून निराळे ठेवण्यात इतक्या लोकांचे हात गुंतलेले जाहत की, न्यायाच्या नावाने त्यांच्यावर व इतरांवर काही अन्याय तर होत सल ना, अशी शंकाही कोणाच्या मनात येत नाही. निरनिराळ्या शब्दांना सनराळ्या काळी काही विशेष 'धार्मिक' महत्त्व आलेले असते व त्यामळेही उकळ लोकांवर अन्याय होण्याचा संभव आहे. 'को-ऑपरेटिव्ह शेती' हा एक नाच शब्द आहे. शेतीचे उत्पन्न खावयाला पुरत नाही, तेव्हा ते वाढवावयाचे, य. रशिया व चीन ह्या देशांत 'को-ऑपरेटिव्ह शेती' चालू आहे, तेव्हा हा ती करावी, असे एका पुढा-याच्या मनात आले. सुदैवाने देशात त्याची सक्ती कायद्याने झाली नाही; पण होण्याचा समवन मात काही विचार आला की, तो सबंध समाजावर लादणे हा एक घोर जाह. ज्यांच्याविषयी ही नवी सुधारणा आहे किंवा ज्यांच्या आयुष्याला अख्यतः निराळे वळण लागणार आहे. त्यांचा विचार घेण्याला काय हरकत असावी? पण अशा त-हेच्या वर्तणुकीच्या बुडाशी एक गृहात सुधारणेचा विचार ज्याच्या मनात आला, तो मनुष्य शहाणा, ' विचारवंत व लोकहितदक्षक असा असतो; व ज्यांच्यासंबंधी करावयाच्या ते अज्ञ. अशिक्षित मागासलेले असतात. त्यांना ' कळत नाही. तर देशाचे किंवा समाजाचे काय कळणार? .. मग ते राजपुरुष असोत किंवा इतर कोठल्याही वर्गाचे असोत, समजतात व सत्तेच्या जोरावर आपले विचार इतरांवर तात. ह्याच संदर्भात "स्वातंत्र्य' ह्या तत्त्वाचा विचार करावा शिकलेला, विचारवंत व लोका स्वतःचे हित कळत नाही, त शासक, मग ते राजपुरु स्वतः लादीत असतात. ह्याच लागेल. १११ ।। संस्कृती ।।