पान:साथ (Sath).pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साठी घ्यायचं?"
 " ज्यांच्याशी व्यवहार करायचा ती माणसं अशी वागली म्हणजे मग पाऊल मागे घ्यावंच लागतं ना?"
 " हॅ:! हे घडलं ते काहीच नाही. असं चालायचंच. माणसं अशीच असतात. पण एवढं मात्र लक्षात ठेव. ह्या प्रकरणावर अजून पडदा पडला नाहीये.”
 पडदा पडण्यापूर्वीच्या शेवटच्या अंकात यशवंतराव नंतरच्या वर्षी बिरवाडीच्या शेतकऱ्यांच्या वतीने बीजोत्पादनासाठी पुन्हा करार करायची भाषा बोलत रामकडे आले. तोपर्यंत सगळ्यांनाच माहीत झालं होतं की जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या बियाणापोटी शेतकऱ्यांना थोडासा ॲडव्हान्स दिला होता तेवढेच पैसे त्यांच्या पदरात पडले होते. उरलेले पैसे पेरणीचा हंगाम झाल्यावर द्यायचे असं ठरलं होतं. पण त्या वर्षी त्या सबंध भागात दुष्काळ पडला, पाऊस झाला नाही आणि पेरण्याही झाल्या नाहीत. बहुतेक कुणाचंच बी विकलं गेलं नाही.
 एरवी रामने यशवंतरावांना आल्या पावली हाकलून दिलं असतं, पण आता त्यांना खोचून बोलण्याची संधी तो दवडणार नव्हता.
 " अतिशहाणपणाचं हे असं फळही मिळू शकतं लक्षात ठेवा यशवंतराव. खरं म्हणजे मी तुमचे आभार मानायला हवेत. ते बी मला मिळू न देऊन तुम्ही माझ्यावर उपकार केले, नाहीतर आता ते सगळं माझ्या अंगावर पडलं असतं. आणि पुन्हा करार करण्याबद्दल म्हणाल तर तुम्ही विचारण्याआधीच माझं उत्तर तुम्हाला माहीत असायला हवं होतं. तितपत हुशार असाल असं वाटलं होतं मला. आता सगळ्यांकडे गेल्या वर्षीचे बियाणाचे स्टॉक असताना पुन्हा यंदा बी तयार करण्याइतका मी मूर्ख आहे असं तुम्हाला खरंच वाटलं का? आणि पुन्हा पुढल्या सीझनला समजा मी ज्वारीचं बी केलं तरी जगाच्या पाठीवर असं एक गाव आहे की तिथे कधीही करणार नाही. त्या गावाचं नाव तुम्हाला ठाऊकच आहे."
 " माझं ऐकून तरी घ्या, साहेब."

७० : साथ