पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. जो दुसऱ्याचें अंतर जाणें । देशकाळ प्रसंग जाणें । तया पुरुषा काय उणें । भूमंडळीं ॥ नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथें आचारचि बुडाला । वेदशास्त्र ब्राह्मणाला । कोण पुसे ॥ ब्रह्मज्ञानाचा विचारु । त्याचा ब्राह्मणासीच अधिकारु । 'वर्णाना ब्राह्मणो गुरुः' । ऐसें हें वचन || ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले । गुरुत्व सांडून झाले । शिष्य शिष्याचे || कित्येक दावलमलकास जाती । कित्येक पिरासी भजती । कित्येक तुरुक होती । आपुले इच्छेनें ॥ ऐसा कलीयुगीं आचार । कोठें राहिला विचार । पुढें पुढें वर्णसंस्कार । होणार आहे गुरुत्व आलें नीच याती । कांहीं एक वाढली महंती । शूद्र आचार वुडविती । ब्राह्मणांचा ॥ हें ब्राह्मणांस कळेना । त्याची वृत्ति च वळेना । मिथ्या अभिमान गळेना | मूर्खपणाचा || राज्य नेलें म्लेंच्छक्षेत्रीं । गुरुत्व नेलें कुपात्रीं । आपण अरत्रींना परत्रीं । कांहींच नाहीं ॥ ब्राह्मणांस ग्रामण्यानें वुडविलें । विष्णूनें श्रीवत्स मिररावलें । त्याच विष्णूनें शापिलें । परशुरामा || आम्हीही तेचि ब्राह्मण | दुःखें वोलिलों हें वचन | वडील गेले ग्रामणी करून । आम्हां भोंवते ॥ आतांच्या ब्राह्मणी काय केलें । अन्न मिळेना ऐसें झालें । तुम्हां बहुतांचे प्रचीतीस आलें । किंवा नाहीं ॥ बरें वडिलांस काय म्हणावें । ब्राह्मणांचें अदृष्ट जाणावें । प्रसंग बोलिलों स्वभावें । क्षमा कीजे ॥ या दशकाचे शेवटचे तीन अध्याय मात्र पुनः अध्यात्मपर आहेत व