मग जे जे कां निमिख | देखेल माझे सुख |
तेतुले अरोचक | विषयीं घेईल ॥
असो. साधकाचे जीवनांत नेम हा मुख्य इतर गोष्टी दुय्यम हे ओळखून
वागावे.
इ स. १९१९ सालीं श्री गुरुदेवांची प्रकृति अतिशय विघडली.
मातोश्री व पत्नी वारल्यामुळे, शुश्रुषा करणेस कोणीही नव्हते. म्हणून
परमेश्वरावर सर्व भार टाकून, त्यांनी आपला नेम वाढविला. आध्या-
त्मिक अनुभव वाढले. त्या अनुभवावद्दल, त्यानींच लिहिलेला अभंग
काय सांगतो ते पहा :
अनंतरूपी आत्मा बिवविला डोळा । होतसे सोहळा आनंदाचा ||
शेषाचे वेटाळें प्रकाश चांदण्याचा | दिसतसे साचा दृष्टीपुढे ||
मोतियाचे जाळे शुद्धवत चुरा । शोभे जैसा हिरा चकचकीत ||
चक्रामध्ये चक्र एक नीलवर्णं गुरुकृपे जाण दिसतसे ॥
त्याचवर्षी श्री गुरुदेव आणि काका कारखानीस हे टांग्यातून
आळंदीला चालले होते. टांग्यातून जाताना श्री गुरुदेवाना श्रीकृष्णाचें
दर्शन सतत घडत होते. ज्ञानेश्वरांचा एक अभंग आहे :
तुझिये निढळी कोटी चंद्र प्रकाशे | कमलनयन हास्यवदन भासे ||
कृष्णा हाल कारे, बोल कारे । घड़िये, घड़िये, घडिये गुज
बोल कारे ||
उभा राहोनिया कैसा हालवितो बाहो । वापरखुमादेवीवरू
विठ्ठल नाही ||
आळंदीला पोचेपर्यंत हा अनुभव त्याना येत होता. नंतर त्यांनी काका
खारखानीस यांना यावावत सांगितले. श्री गुरुदेवांना हा अभंग त्यानंतर
अत्यंत आवडू लागला.