Jump to content

पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ २३ ॥ अग्निज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् । तत्र प्रयाता गच्छान्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥ २४ ॥ धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् । तत्र चांद्रमसं जोतियोगी प्राप्य निवर्तते ॥ २५ ॥ शुक्लकृष्णे गती घेते जगतः शाश्वते मते। शब्द सांख्यांच्या प्रकृतीस उद्देशून आहे असेहि यावरून उघड होते (गी १५.१९-१८ पहा). तात्पर्य, 'अध्यक्त' व 'अक्षर' ही दोन्ही विशेषणे कधी सांख्यांच्या प्रकृतीस, तर कधी या प्रकृतीच्या पलीक- इल्या परब्रह्मास उद्देशून गीतेत योजिलेली असतात हे लक्षात ठेविलें पाहिजे (गतिार. पृ १९८ व १९९ पहा ). व्यक्त आणि अव्यक्त यांच्या पलीकडल्या परब्रह्माचे स्वरूप गीतारहस्याच्या ९ व्या प्रकरणांत स्पष्ट केले आहे ते पहा. ' अक्षर ब्रह्म' म्हणजे ज्या स्थानी पोचले असतां मनुष्य पुनर्जन्माच्या तडाक्यातून सुटतो त्याचे वर्णन झाले. आता मेल्यावर ज्यांना अनावृत्ति म्हणजे परत फिरावे लागत नाही, आणि ज्यांना आवृत्ति म्हणजे स्वर्गाहून माघारे येऊन पुनः जन्म घ्यावा ला. गतो, त्यांच्यामधील कालाचा व गतीचा भेद सांगतात-] (२३) आतां (कर्म) योगी ज्या काली मेले असता परत (या लोकी जन्मास) येत नाहीत, आणि (ज्या काली मेले असतां परत येतात, तो काल है भरतश्रेष्ठा ! तुला सांगतो. (२१) अग्नि, ज्योति म्हणजे ज्वाला, दिवस, शुक्लपक्ष, उत्तरायणाचे सहा महिने, यांत मेलेले ब्रह्मवेत्ते लोक मेल्या. वर प्रयास पोचतात (परत येत नाहीत), (२५) (आमि) धूर, रात्र, तसेच कृष्णपक्ष, दक्षिणायनाचे सहा महिने, यांत (मेलेला) (कर्म-) योगी चंद्राच्या तेजास म्हणजे चंद्रलोकास जाऊन (पुण्यांश सरल्यावर ) परत - --- - - - - - - - - - - - -