पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आभाळाकडे पाहत ती हात जोडते नि म्हणते देवाची करणी माणसा माणसांची जोडणी.
 सुरुवातीला आजींनी तिला स्वयंपाक घरातील नवनव्या साधनांची माहिती दिली. स्वच्छता, टापटीप यांचे धडे दिले. पणजीबाई मात्र आंजा अंकुशवर नाराजच होत्या. "माधवा, कोण कुठली माणसं, कोणत्या जातीची हे तरी विचारलंयस का? माझं अर्ध आयुक्ष कोकणातल्या गावात, सोवळं ओवळं पाळण्यात गेलं. मला कळतंय रे माझ्या पांगळीचं करायला माणूस हवंच. सूनबाईची साठी उलटून दोन वरीसं झाली. ती तरी कुठे धावपळ करणार? पण निदान माझ्यापुरती एखादी पोळी करीत जा म्हणावं. नि वरणा भाजीला फोडण्याही घालत जा. त्या पोरी कडून बाकी सगळी उस्तवारी करून घ्यावी. पण गॅस पाशी कशाला ती?..." पणजीबाईंनी काहीशा कडक शब्दांत आपल्या मुलाला… माधवरावांना-आजोबांना फर्माविले. आईचे बोलणे ऐकूण आजोबा हसले.
 "आई, माझी सत्तरी जवळ आलीय. या बंगलीत येऊन पस्तिस वर्ष झाली. गेली पंचेचाळीस पन्नासहून अधिक वर्ष मुंबईत वाढलीस तू. तरी अजून सोवळ्या ओवळ्यातच बुडालेली? वसुधा तुझ्यासाठी नक्की चार पोळ्या करील. तू काळजी नको करूस.
 आई, सतत तीन वर्षाचा दुष्काळ. शेताला पाणी नाही. हाताला खेड्यातून काम नाही. मागास भाग म्हणून जवळच्या शहरातून काम नाही म्हणून ही माणसं मुंबईत आलीयेत. आठव ना तू जुने दिवस. माझे आजोबा कोकणातले. कोकणातील चार गुठ्यांच्या दोन तुकड्यात भात तो किती पिकणार? ते कोकणातून इथे का आले? माझे तात्याही चाकरमाने बनून इथेच राहिले ना? तुही आमच्या शिक्षणासाठी पावसचा चौसोपी वाडा सोडून गायवाडीच्या दोन खोल्यांच्या चाळीत रमलीस की नाही?
 उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरमानी अस तूच शिकवलंस ना आम्हाला? पण गरजेनं आलोना इथं आपण! झालो ना चाकारमान्या मी? तुझी नातवंड भरपूर पैसा पाठवतात. मला पेन्शन मिळतं. पण खायला भात भाजी नि भाकरीच हवी ना?

 अंकुश शेतकरी आहे. जातीला काय पाहाचयं? हे बघ चारपैसे जमले की तोही जाईल त्याच्या गावाकडे. शेतात पुरलेलं मन मुंबईत कसं रमेल. दहा एकराचा मालक आहे तो. आणि आपलं म्हणातारपण या पोरांमुळे गार सावलीत निवांतपणे घालवतोय


शोध अकराव्या दिशेचा / ८०