पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तरकारीचा भत्ता संपला. पोळी भाजी मिळू लागली. पाहता पाहता सात महिने उलटून गेले होते. एका खोलीत दोन जणांना ठेवत.
 या निर्णयामुळे जेलच्या अधिकाऱ्यांची धांदल उडाली. नाशिक मध्यवर्ती कारागृहात सुमारे पंधराशे मिसा राजबंदी होते. एवढ्यांना कॉट्स, टेबल, टेबल लॅम्प, गाद्या, ऊशा… एवढ्या मोठ्या प्रमाणावर या वस्तू अवघ्या काही दिवसात तयार करण्याची धांदल उडाली. काथ्याच्या उशीचा सहवास संपला. गादी मिळाली. कॉट आला. मऊ गादी, दोन उशा, एक तकिया, पांढरी चादर, दोन कॉटस च्या मध्ये टेबल आणि त्यावर चक्क वाचण्यासाठी टेबललॅम्प. रात्रभर वाचायला परवानगी. सायंकाळी लावले जाणारे कुलूप काढले गेले. रात्री पूर्ण बराकीलाच कुलूप घालीत. त्यात भर अशी मुंबईकर मंडळीनी ट्रकभरून पुरणपोळ्या आणि ट्रकभरून पुस्तके पाठविली.

 मिसा राजबंद्यांची आवक मात्र थांबली नव्हती. एक दिवस मराठवाड्यात आदराचे स्थान असलेले त्र्याऐंशी वर्षाचे शर्माजीही यासर्वात दाखल झाले. सगळे मिसा कैदी शर्माजींना नानाजी म्हणून हाक मारतात. महात्मा गांधीजी आणि विनोबाजी यांच्या आचार विचारांच्या अत्यंत निरोगी… निरामय मिश्रणातून साकारलेली मूर्ती म्हणजे नानाजी. महात्माजींनी १९३० साली मिठाच्या सत्याग्रहासाठी तीस जणांची निवड केली होती त्यातले एक नानाजी होते. नानाजींच्या डोळयातून नेहमी अपार माया, आत्मीयता पाझरत असते. आणीबाणी जाहीर झाली तेव्हा नानाजींनी त्र्याऐंशीव्या वर्षात नुकतेच पाऊल टाकले होते. पण चालणे मात्र ताठ. खादीचे धोतर. पांढरा धुवट नेहरू शर्ट. अर्थात् तोही पांढराच. खांद्यावर गमछा. कपाळ आणि डोके यांच्यातली सीमारेषा पार पसलेली. चकचकित टक्कल असलेल्या डोक्याला पांढऱ्या तुरळक केसांची झालर. डोक्याच्या डाव्या बाजूला काळा तीळ. असे हे नानाजी पहाटे पाचला उठून प्राणायाम करतात. थंड पाण्याने स्नान करतात. नंतर दोन तास चरख्यावर सूत काततात. त्यांच्या चरख्याच्या आवाजालाही एक पवित्र लय होती. त्या आवाजनेच पहाट उजाडते. नानाजींच्या भत्त्यावर अमन, अशक्या, बन्सी यांच्या उड्या असतात. जेलरनाही नानाजीबद्दल नितांत आदर आहे. ते त्यांच्यासाठी घरून गुळ आणून देतात. नानाजींचा भत्ता म्हणजे गुळाचा खडा आणि तांब्याभर पाणी. असे हे नानाजी सत्याग्रह करून नासिक कारागृहात आले आहेत. नानाजी इंदिरा गांधीचा उल्लेख नेहमीच 'इंदू बिटिया' असा करतात. पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात एकूण सात वर्षे तुरुंगात काढलेल्या नानाजींनी दुसरे स्वातंत्र्य मिळविण्यासाठीही


शोध अकराव्या दिशेचा / ७६