पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एका खोलीत कोपऱ्यात मोरी आहे. तिला आडोसा नाही. सर, सर्व कैदी, वकील, डॉक्टर, प्राध्या...” पी.एस.आय.चे वाक्य तोडीत बीडहून कडक शब्दात बजावले गेले.
 "हा आदेश दिल्लीचा व्हाया मुंबई आला आहे. तात्काळ पाळा."
 तुरूंगातल्या त्या खोल्या म्हणजे साक्षात नरक, कित्येक वर्षात झाडू लागलेला नसावा. कोपऱ्यात भिंतीवर जाळ्यांचे साम्राज्य पसरलेले. आणि भेसूर डोळयांचे, केस दाढी वाढलेले कैदी. ते घाबरून आणि बावरून एका बाजूला जाऊन बसलेले.
 "पक्या माझ्या अंगाला तर हे सारे पाहूनच खाज सुटलीय."अशक्या तोंडातल्या तोंडात कुणकुणला. ती रात्र युगासारखी दीर्घ. लघुशंकेसाठी ठेवलेला पत्र्याचा डबा. तो बाहेर नेऊन दरवेळी रिकामा करणारे ते कैदी. गप्पांनाही नशा चढत नव्हती. श्रीनाथच्या मनात कोळीष्टकांचे काहूर. काही तासात आम्ही हादरलो. मग स्वातंत्र्य लढ्यातील तरूणांनी आणि सक्तमजुरी भोगणाऱ्या कैद्यांनीही कसे सोसले असेल. डोळ्यात रात्र जागी होती. पण प्रत्येक जण शेवटी तिला शरण गेला. सकाळची उन्ह बोचू लागली. अमन हरून सैयंदला हिटलरच्या कॉन्सेट्रेशन कॅप्समध्ये आपण आहोत असे वाटले. त्या भयानक दुर्गंधीने तो घामेजून जागा झाला. संघाचे दादाराव मात्र सर्वांना उत्साह देत होते.
 "सावकरांचा तुरुंगवास आठवा आणि पुढच्या संघर्षासाठी सज्ज व्हा तरूणांनो, सज्ज व्हा. या राष्ट्रासाठी क्रांतीवीर भगतसिंग, राजगुरु..." दादाराव अहिरवाडाकरांच वाक्य तोडीत, त्याच घनगंभीर आवाजात अशोकने टेप सुरु केला....
 "पंडित जवाहरलाजी, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांना सहा सहा तास बर्फाच्या लादीवर बसवून ठेवले. लहानग्या शिरिषकुमारला गोळ्या घालून पाणी मागणाऱ्या शिरीषला म्हणून रॉकेल प्यायला दिले. पण राष्ट्रातल्या सामान्य माणसाला..."
 "अशोकजी तुम्ही माझी चेष्टा करण्याच्या हेतूने बोलत असाल तर..."
 "नाही...नाही... दादाराव. बेचाळीसच्या चळवळीचा फक्त आढावा घेतला हो... दादाराव शेवटी आम्ही भारतीयच." अशोक काहीशा खवचट आदबीने म्हणाला. एवढ्यात पी.एस.आय.चाटे आले आणि त्यांनी तुरुंगाचे कुलूप काढून सर्वाना बाहेर काढले. समोरच्या कार्यालयात येण्यास सांगितले.
.....

 "अने, पाणी कडकडीत गरम कर. मी बाहेरच थांबलोय, माझ्या अंगावर किती लिखा नि किती उवा असतील ते त्याच जाणे. शिवाय गोचिडा वेगळ्या. गॅसवर दोन्ही


शोध अकराव्या दिशेचा / ५६