पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



११.






 मृग नक्षत्र लागून आठ दिवस झाले तरी आभाळ निरभ्रच होते. गेले सालही पाऊस बेताचाच झाला होता. हस्त मात्र रपाकवून बरसला होता. त्यामुळे रबीची सुगी थोडीफार हाती आली होती. डोंगर भागातले प्रमुख पीक म्हणजे पिवळी ज्वारी, हायब्रीड बाजरी, थोडफार तीळ, मूग, उडिद. ही पिके आगातात-आषाढ सुगीत येतात. पण आगाताची सुगी बहरलीच नाही. डोंगरात गहू, मोठी जवार लावण्यासारखी सपाट राने कमीच. त्यातून विहिरी गेल्या बारा तेरा सालापासून कोरड्या ठण्ण पडल्या आहेत. पाण्याचे फुटवे मोकळे व्हावेत असा पाऊस नाहीच. हजारो कुटुंबे गेल्या बारा तेरा वर्षांपासून मुंबई पुण्याकडे, कोकणात, गुजरातेत जात आहेत. तो ओघ सुरुच आहे. त्यातील काही कुटुंबे काही काळापुरती, उसतोडीच्या हंगामात सांगली साताऱ्याकडे जात तर काही मुंबईकडे बांधकामासाठी जात. पण उन्हाळा सुरु झाला की गावाकडे येत. पण गेल्या सात आठ वर्षात अनेक जण तिकडचेच झाले आहेत.

 पुलावरून बरेच पाणी वाहून गेलेय. १९८० मध्ये श्रीनाथ, डॉक्टर मोहन, अण्ण्या, पक्या... अशक्या... अमन्या, बप्पा यांनी मिळून डोंगर विकास समितीला आणि बदलाव संघटनेला पुन्हा ताजवा दीला होता. प्रकाश आणि श्रीनाथ यांनी देवठाण, दगडवाडी, यल्डा, साकूड, भावठाण, ममदापूर इत्यादी तीन खेडयातून भेटी दिल्या होत्या. डोंगरातलं ममदापूर, खापरठाण, आरळ इत्यादी गावात जायचे तर देवठाणात नाही तर यलड्यात गाड्या लावून चार कोस पायी जावे लागे. सातमाळाचे बुटके डोंगर. नुस्त्या दगडांनी भरलेले मधून वाहणाऱ्या दोन नद्या. एक जयवंती आणि दुसरी वाणा म्हणजेच वैनगंगा. जयवंती बुटेनाथाच्या डोंगराच्या पायथ्याशी मिळत असे. वाणाचा ओघ गेल्या दहा बारा वर्षांत रोडवला आहे. पण जुनी जाणती


शोध अकराव्या दिशेचा / १२७