पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बांधावर भाताच्या लावणीसाठी रोपांचे जुगडे तयार करून ठेवले होते. अधुनमधुन जुलैच्या भर पावसात लावलेली भाताची शेते आता सोनसळी होऊन झुलायला लागली आहेत. डिसेंबर अगदी अंगणात उभा आहे. ओचा पदर खच्चाटून खोचून आंबड्यात चवेणी अबोलीची फुले माळलेल्या शेतकरणी बांधाकडे लगालगा चाललेल्या होत्या.
 ... शेतकऱ्याचे जीवन किती कष्टाचे असते. एवढे कष्ट करून हाती काय येते. शेतमालाचा भाव ठरवणार दलाल आणि व्यापारी! या भागात पाणी तरी विपुल आहे. पण बीड जिल्हा?....एकूणच मराठवाडा? आमच्या नद्या कायमच तहानलेल्या. कोरड्या ठण्णं. त्याला नानीची आठवण झाली. नव्वदी ओलांडलेली नानी. तिचे आजोळ डोंगरातल्या साकुडाचे होते. लहानपणच्या आठवणी सांगतांना नानी रंगात यायची. अैंशी वर्षांपूर्वी ..."अरं म्हे घ्यावणी छोटी हाँ. थारा नानाजी का साथ म्हारा ब्याह हुयो, जरा म्हे सात आठ साल की ही..." नानीचं मराठवाडी मारवाडी ऐकायला खूप छान वाटायचं. त्यावेळी बुट्टेनाथाच्या डोंगरदरीत घनदाट झाडी होती. भर दिवसा जयवंती-वाणाच्या संगमावरून पल्याड जायचे म्हटले तर घाम फुटे जरा पाऊस बदबदून पडला की वाणा.... जयवंती भरभरून वेगाने वाहत. अल्याडली माणसं अल्याड नि पल्याडली माणसं पल्याड रहात. मात्र तासा दोन तासात पाणी वाहून जाई. पुन्हा वाळू खडकांचे राज्य. तिथे बिबटे राहत. हरणे बागडतांना दिसत. आज त्या डोंगरात तहानलेल्या वाळूच्या नद्या आणि बोडखे वैराण डोंगर उभे आहेत.
 "चहा घ्या वकीलसाहेब. कुठे तंद्री लागली? लेकराबाळांची याद येत असेल नाही का?... संपतील हेही दिवस. श्रीनाथच्या हातात चहा देत पी.एस.आय. बोलले. चहा पितांनाही तेच विचार... एक दिवस पानात भात वरण नसेल तर उपास पडतो आम्हाला. पण पिकवणाऱ्याच्या लेकराबाळांना तरी पुरेसं अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य मिळत असेल? ...?"
 इगतपुरी स्टेशन मागे पडले. श्रीनाथ फ्रेश होऊन... तोंड धुवून आला. अंगावर अनूने विणलेला लांब बाह्यांचा स्वेटर चढवला आणि नासिकची वाट पाहू लागला.
 नासिक आता चांगलेच गारठले आहे. खरे तर नासिकहून गांवी परतण्यापूर्वी गंगेचे सुंदर घाट पहायचे आहेत. काळ्या रामाचे देऊळ, नारो शंकराची प्रचंड घंटा, दक्षिण गंगेचा शांत झुळझुळता प्रवाह, त्र्यंबकेश्वरचे पुरातन शिवमंदिर.... 'गर्जा जय जयकार क्रांतीचा' सारखे, तरूणांच्या अंगात उर्मी.... उर्जा फुलवणारे गीत लिहिणाऱ्या कवी कुसुमाग्रजांची भेट, या साऱ्यांना डोळेभरून पहायचे आहे. पण नासिकहून परतण्याची आहे का शक्यता?

 श्रीनाथने मनातले विचार झटकून टाकले आणि तो अमनच्या बरॅकमध्ये


शोध अकराव्या दिशेचा / १११