पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दोन देशमुख, दोन तीन मारवाडी, तीन मेहमनी यलम, एखाद दुसरा ब्राम्हण अशी दहाबारा घरे सोडली तर सगळे शेतकरी दोनचार एकर वाले. त्यातही बहुतेकांची जमीन कोरडवाहू. बलुतेदारांकडचे काम कमी झालेले. गावातील बरीचशी तरूण मंडळी पुण्यामुंबईकडे भाकरीसाठी पांगली आहेत. मजलेगाव धरणाचा एक कालवा धानोरा, कुंबेफळ, सातेफळाकडून जाणार आहे असा लोकांत बोलवा आहे. समज आहे. त्या आशेवर काहीजण गावात थांबले आहेत. गावाची कळाच हरवली आहे भर श्रावणातही गाव उदास वाटतेय. श्रीनाथ गणूच्या वडलांना भेटायला गेला. त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी दोन एकर जमीन शेजारगावच्या पाटलाला विकली. उरलेल्या तीन एकरात घर कसे चालणार? हे सारे ऐकून श्रीनाथची अस्वस्थता अधिकच गहिरी झाली.
 श्रीनाथ, अनू धानोऱ्याला पोचण्यापूर्वीच विमलाभाबींनी भावकीतल्या बाया, त्यांच्या मैत्रिणी यांना बोलावून तीळशेंगदणाच्या गोड तेलच्या करून ठेवल्या होत्या. श्रीदादांनी माळ्यावरून प्लास्टिकचा मोठा डबा काढून दिला होता. तेलच्या गार होण्याची वाट पहात दोघीतिघी थांबल्या होत्या. बाईच्या सांगण्यावरून जवसाची चटणी कुटून तयार होती. उन्हं उताराला लागली. बाई काकाजी, गावातील मंडळी... सगळ्यांचा निरोप घेऊन जडशीळ पावलांचे ओझे सावरीत श्रीनाथ आंब्याकडे निघाला. बाईच्या गळ्यातले सोन्याच्या मण्यात ओवलेले गंठन खूप चमचमत होते. त्यावर झळाळी होती बाईच्या तृप्त मनाची.

 'घराचा जिना चढतानाच सुधा वहिनींनी स्वागत केले. या. बघा कोण पाहूणे आलेत ते!'
 अनूची आई चहा पीत होती. आईला पाहून अनू चकित झाली. खुश झाली.
 'जावई पॅरोलवर आलाय हे कसं कळलं ग तुला? तुला पाहून श्री खुश होईल. तो वाटेतच उतरलाय. बाबा नाही आले?' आईला अनूने विचारले, 'आधी चहा पी' असे म्हणत सुधाताईंनी अनू समोर चहाचा कप धरला. जळगावच्या सुनिल दिघेला श्रीनाथच्या दुसऱ्या दिवशी पॅरोल मिळाला. त्याने सांगितल्यामुळे आई सकाळच्या गाडीने अंबाजोगाईला निघाल्या. बाबांना मात्र वेळ नव्हता. श्रीनाथने बप्पांची गाडी त्यांच्या घरी सोडली. चहा घेऊन बप्पांच्या मोटार सायकल वरून तो चनईला निघाला. भीमा पांचाळच्या लेकरांना भेटायला. चनईच्या शेवरे मामांकडे चौकशी केली. एवढ्यात दोन पोरं प्लास्टिकच्या बॅगचा फुगा फुगवून, त्याला दोरी बांधून तो फुगा


शोध अकराव्या दिशेचा / १००