पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड पित्रे, शशिकांत गिरिधर इन्फन्ट्री डिव्हिजनमध्ये कार्यरत होते. या युद्धातील पहिला ‘क्रुपमान’ पूल त्यांनीच बांगला देश सीमेवरच्या बायरा नदीवर जस्सौर विभागात बांधला. बांगला देशातील विजयासाठी हाच पूल पुढे ‘विजय सेतू’ (ब्रिज टू व्हिक्टरी) म्हणून ओळखला गेला. या युद्धानंतर त्यांची नियुक्ती नागपूरस्थित ‘गॅरीसन इंजिनिअर्स’मध्ये झाली. त्यानंतर त्यांनी ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’मधून एक महत्त्वाचा प्रशिक्षणक्रम पूर्ण केला. १९७५मध्ये त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमध्ये ‘ब्रिगेड मेजर’पदी झाली. १९७७मध्ये चिलखती विभागाच्या (आर्मर्ड डिव्हिजन) एकशे चौदाव्या आर्मर्ड रेजिमेंटच्या कमांडरपदी शशिकांत पित्रेंची नियुक्ती झाली. पाच वर्षे ते या पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी महू येथून उच्चाधिकारी पाठ्यक्रम (हायर कमांड कोर्स) पूर्ण केला. त्यानंतर त्यांची नियुक्ती ‘कर्नल - जनरल स्टाफ’ या पदावर पुणेस्थित भूसेनेच्या दक्षिण विभागात (सदर्न कमांड) झाली. तेथूनच त्यांची नियुक्ती ‘कर्नल - जनरल स्टाफ, ऑपरेशन्स’ या पदावर श्रीलंकेतील भारतीय शांतिसेनेमध्येे झाली. तीन वर्षे या पदावर ते तेथे कार्यरत होते. भारतीय शांतिसेनेच्या एकूण कार्यवाहीचे व हालचालींचे नियोजन यात त्यांच्या महत्त्वाचा सहभाग होता. १९९० मध्ये त्यांची नियुक्ती पहिल्या कोअरच्या मुख्य अभियंतापदी झाली. तेथून त्यांची ‘जनरल कॅडर’मध्ये पदोन्नती झाली. त्यांची नियुक्ती पहिल्या इन्फन्ट्री ब्रिगेडवर सिक्कीम सीमेवर झाली. त्यानंतर त्यांच्या त्याच ब्रिगेडकडे मणिपूरच्या फुटिरतावाद्यांनी त्रस्त अशांत भागाची जबाबदारी देण्यात आली. १९९४ मध्ये त्यांच्याकडे पश्चिम सीमेवर तैनात असलेल्या नवव्या इन्फन्ट्री डिव्हिजनचे ‘डिव्हिजन कमांडर’ म्हणून नेतृत्त्व देण्यात आले. १९९६मध्ये त्यांची नियुक्ती शिमलास्थित भूसेनेच्या प्रशिक्षण विभागाचे (आर्मी ट्रेनिंग कमांड) उप प्रमुख (व्हाईस चीफ ऑफ स्टाफ) म्हणून झाली. सैनिकांंचे प्रशिक्षण आणि सैद्धान्तिक भूमिका तयार करण्याचे कार्य हा विभाग करतो. एप्रिल १९९८ मध्ये भूसेनेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी युद्धांशी संबंधित दोन कार्ये सुरू केली. पहिले कार्य म्हणजे विविध वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून राष्ट्राच्या संरक्षण क्षेत्राविषयी प्रबोधन करणारे आणि युद्धविषयक विश्‍लेषण करणारे चतुरस्त्र लेखन त्यांनी सुरू केले. १९९९ च्या कारगील युद्धकाळात त्यांची दै. सकाळमधून प्रकाशित झालेली ‘व्यूह आणि वेध’ ही दैनिक लेखमाला गाजली. त्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी दै. लोकसत्तातून प्रकाशित झालेली ‘व्यूहवेध’ ही लेखमाला लोकप्रिय झाली आणि शतकमहोत्सवी ठरली. अमेरिकेच्या इराकवरील हल्ल्याच्या वेळी दै. लोकसत्तेतून पुन्हा ‘व्यूहवेध’ ही लेखमालिका प्रकाशित झाली. याशिवाय इतर अनेक नियतकालिकांमधूनही त्यांनी संरक्षणविषयक जनजागृती करणारे लेखन केले आहे. कारगिल युद्धावरच्या त्यांच्या ‘डोमेल ते कारगिल’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोत्तम ग्रंथ पुरस्कार २००१ मध्ये मिळाला. अन्यही काही पुरस्कार या पुस्तकाला प्राप्त झाले आहेत. नौसेनाध्यक्ष भास्कर सोमण यांचे त्यांनी लिहिलेले चरित्र ‘अ‍ॅडमिरल सोमण - भारताचे सरखेल’ गाजले आहे. ‘श्रीलंकेची संघर्षगाथा’ हे श्रीलंकेतील तमीळ अतिरेक्यांविरुद्ध भारतीय शांतीसेनेच्या तेथील कामगिरीवर लिहिलेले पुस्तकही वाचकप्रिय ठरले आहे. ही सर्व पुस्तके राजहंस प्रकाशनने प्रकाशित केली आहेत. भारतीय नौसेनेच्या विनंतीवरून त्यांनी सोमणांच्या चरित्राचे इंग्रजी भाषांतरही केले आहे. त्यांचे दुसरे कार्य जागतिक पातळीवरील भूसुरुंग विरोधी कार्य हे आहे. जगभरात युद्धकाळात हजारो भूसुरुंग पेरले जातात. भारतीय सेना आपल्या उज्ज्वल परंपरेप्रमाणे युद्धोत्तर काळात संपूर्ण भूसुरुंग क्षेत्र साफ शिल्पकार चरित्रकोश ४६७