पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड मोरे, दिनकर माधव मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण केली. १९६६ ते १९६८ हे दोन वर्षं महाराष्ट्रातील उमरगा या ग्रामीण आणि मागासलेल्या भागातील महाविद्यालयात काढली आणि मराठवाडा विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. एक वर्षानंतर विद्यापीठात परत अग्रक्रमावर असल्यामुळे या वेळच्या नियमाप्रमाणे १९६९ ला पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इलेक्ट्रॉनीक्स आणि टेलिकम्युनीकेशन’ या महत्त्वाच्या शाखेसाठी त्यांची निवड झाली. पुणे येथे एक वर्ष घालविल्यानंतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरींग शाखेकडे वळून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. १९७२ साली पुणे विद्यापीठातून सर्व विषयातली बक्षीसे घेऊन सुवर्ण पदकांसह प्रथम क्रमांकाने बी.ई. (सिव्हिल) ही पदवी संपादन केली. २००६ साठी अभ्यासाचा छंद जोपासून जल विकासाचा इतिहास या विषयात पीएच.डी. पदवी त्यांनी संपादन केली. ‘वालचंद हिराचंद’ या नामवंत संस्थेचे ते शिष्यवृत्तीधारक होते आणि कराराप्रमाणे या संस्थेच्या ‘हिन्दुस्थान कन्स्ट्रक्शन’ या बांधकाम कंपनीत पदवीनंतर काही काळासाठी सेवा देण्यास ते बांधील होते. निकालाच्यापूर्वीच त्यांना कामावर रुजू होण्यासाठी बोलविण्यात आले. मुंबई येथील मुलाखतीत त्यांनी स्पर्धात्मक परिक्षेच्या माध्यमातून शासनाच्या सेवेत जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यांच्या इच्छेला मान देऊन मुलाखतकाराने त्यांना कंपनीशी केलेल्या करारातून मुक्त केले. पुढे मोरे यांनी नोकरीचा सुरुवातीचा काही काळ यु.पी.एस.सी.च्या माध्यमातून ‘मिलीटरी इंजिनिअर सर्व्हिसेसमध्ये’ विशाखापट्टणम येथील ‘ड्रायडॉक’ या अतिअवजड व अवघड कामावर घालवून ‘मे १९७६’ मध्ये एम.पी.एस.सी.द्वारे महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे (जलसंपदा) विभागात रूजू झाले. भावंडांना मार्गी लावण्याच्या कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्याकडे त्यांनी लक्ष पुरविले. डिसेंबर २००५ ला जलसंपदा विभागाचे महासंचालक (संशोधन, संकल्पचित्र, प्रशिक्षण) या सचिव समकक्ष पदावरून सेवानिवृत्त होईपर्यंत वेगवेगळ्या पदांवर सेवारत राहून सचोटी व गुणवत्तेला प्राधान्य देऊन भीमा, पेंच, विष्णुपुरी, भातसा, मांजरा, तेरणा, पेनगंगा, मनार, लेंडी, माजलगांव, बाभळी, कोयना यासारख्या मोठ्या प्रकल्पांबरोबरच अनेक लहान व मध्यम प्रकल्पांवरील वेगवेगळ्या प्रकारची जसे नियोजन, संशोधन, बांधकाम, व्यवस्थापन इत्यादी कामे करून त्यांन आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला आहे. राज्यात पडलेल्या १९८६, १९९२, २००१ ते २००३ दुष्काळामध्ये ग्रामीण, गरीब लोकांना रोजगार निर्माण करत राज्याच्या रोजगार हमी योजनेच्या कामात हिरिरीने भाग घेतला. हाताखालील प्रशासकीय यंत्रणेला राष्ट्रीय व सामाजिक बांधिलकीच्या विचाराने प्रेरित करून रोहयो योजनेत स्वच्छ प्रतिमेने काम कसे करता येते हे दाखवून दिले. ग्रामीण भागात पक्क्या रस्त्याचं जाळं निर्माण करणार्‍या केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजने’ची जिल्हा परिषदेसारख्या अभियांत्रिकी पाठबळ नसणार्‍या व्यवस्थेच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहून या योजनेचा पाया घालण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मोरे यांनी शासनातील अधिकाराच्या वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असताना बदल घडविणार्‍या अनेक बाबी परिपत्रकाच्या माध्यमातून शासनस्तरावरून त्यांनी सूचित केल्या. उपसा सिंचन योजनेसाठी मार्गदर्शक सूचना देताना स्टँड-बाय पंपाचा विचार त्यांनी कालबाह्य ठरविला. शासनातील चाकोरी बाहेरच्या वेगळ्या प्रकारच्या कामाची जबाबदारी घेण्यास ते सदैव पुढे असत. प्रसिद्ध विचारवंत व जलतज्ज्ञ डॉ.माधवरावजी चितळे शिल्पकार चरित्रकोश