पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3 TNDLA पाध्ये, माधव गोविंद प्रशासन खंड भारत - चीन मैत्री होती. परांजपे यांना चीनमधील बौद्धधर्माचा अभ्यास करायचा होता. म्हणून ही शिष्यवृत्ती मिळवून ते १९४६ ते १९५० या कालावधीत चिनी भाषा अभ्यासण्यासाठी चीनला गेले. या कालावधीत त्यांनी चिनी भाषा, संस्कृती, बौद्ध धर्म या विषयांचा सखोल अभ्यास केला.भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन त्यांनी चीनची राजधानी पेकिंग येथे साजरा केला.

 १९५४ मध्ये इंडोनेशियामधील बांडुंग येथे झालेल्या आफ्रिकी आणि आशियायी देशांच्या बांडुंग परिषदेमध्ये पंडित नेहरू परांजपे यांना दुभाषी म्हणून घेऊन गेले. परांजपे यांचे चिनी भाषेवरील प्रभुत्व पाहून पंडित नेहरू प्रभावित झाले आणि त्यांनी परांजपे यांची भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये नियुक्ती केली. पंतप्रधान नेहरू आणि चिनी पंतप्रधान चाऊ एन लाय यांच्या अनेक चर्चांचे ते साक्षीदार होते.
 भारत-चीन संबंध अत्यंत कठीण प्रसंगातून जात असताना परांजपे चीनमध्ये राजदूत होते. चिनी, चिनी भाषा, संस्कृती यांवर त्यांचा अभ्यास होता. चीनबद्दल त्यांच्या मनात जिव्हाळा होता. त्यामुळेच त्यांनी राजदूत पदाच्या संपूर्ण कारकिर्दीत चीन-भारत संबंध सुधारावेत यासाठी कसोशीने प्रयत्न केले. पुढे भारत-चीन या दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडले तरीही परांजपे यांची त्यांच्या चीनमधील मित्रांशी असणारी मैत्री टिकून राहिली.
 त्यांच्या चिनी मित्रांमध्ये ते ‘बाई चून हुई’ या नावाने प्रसिद्ध होते, तर पंडित नेहरू आणि चिनी नेते त्यांना खासगीत ‘पाय’ असे संबोधत. १९५१ पासून परराष्ट्र सेवेमध्ये त्यांनी अंडर सेक्रेटरी, सहसचिव, उपसचिव अशा विविध पदांवर काम केले. कंबोडिया येथील इंटरनॅशनल कमिशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. १९७७ ते १९७८ या कालावधीत परांजपे इथिओपियामध्ये राजदूत होते, तर १९७८ ते १९८१ या कालावधीत ते दक्षिण कोरियातील पहिले भारतीय राजदूत होते.
 १९८८ मध्ये राजीव गांधी यांच्या चीन दौर्‍याच्या वेळी सेवानिवृत्त असतानाही  परांजपे यांनी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानादेखील ते त्यांचे दुभाषी म्हणून काम करत असत. १९८२ मध्ये ते परराष्ट्रसेवेतून निवृत्त झाले.त्यानंतरही त्यांचा चीनविषयीचा अभ्यास सुरूच राहिला.
 भारतात परतल्यावर ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
 निवृत्तीनंतर काही वर्षांनी ते पुणे येथे स्थायिक झाले. पुणे शहरातील वयोवृद्धांसाठी उभारण्यात आलेल्या ‘अथश्री’ प्रकल्पातील ते पहिले रहिवासी होते. भारत-चीन राजनैतिक संबंधांना २०१० मध्ये ६० वर्षे पूर्ण झाली, त्या वेळी दिल्ली येथील चिनी दूतावासाने त्यांना आवर्जून आमंत्रण दिले होते. प्रकृती ठीक नसूनदेखील या कार्यक्रमात ते उत्साहाने सहभागी झाले. पुणे येथे त्यांचे निधन झाले.

- संपादित

पाध्ये, माधव गोविंद सचिव-जलसंसाधनमंत्रालय,केंद्रीयजलआयोग २५ एप्रिल १९२७ - २१ एप्रिल २०११

 कृषिप्रधान भारत देशाच्या दृष्टीने जलसिंचनाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून स्वातंत्र्यानंतर शासननाने जलसिंचन तंत्रज्ञानाला उत्तेजन देणारं जे धोरण अमलात आणलं त्याला कार्यान्वित करणार्‍या अभियंता पिढीचे एक प्रतिनिधी असलेल्या माधव गोविंद पाध्ये यांचा

५ २८४ शिल्पकार चरित्रकोश