मराठी संस्कृत भाषेतून विकसित झाली. तिला सुमारे १000 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेची सर्वात प्राचीन लिखित रूपं आपणास जुन्या मूर्ती, शिलालेख व प्राचीन साहित्यातून आढळते. इ. स. १११६ श्रवणबेळगोळ येथील भगवान महावीराच्या मूर्तीच्या पायथ्यावर कोरलेली दोन वाक्ये
‘श्रीचामुण्डराजे करविले.
श्री गंगराजे सुत्ताले करविले.'
ही मराठी भाषेची पहिली लिखित अक्षरे मानली जातात. संस्कृतीच्या इतिहासातून असे दिसते की भाषेचं पहिलं रूप तोंडी, मौखिक असतं. तिला बोली म्हणतात. ती लिहायला लागलो, सर्वत्र एकसारखी बोलू लागलो की बोलीचं रूपांतर भाषेत होतं. भाषा विकसित झाली की तिचं व्याकरण, नियम, परंपरा इत्यादीतून सार्वत्रिक रूप तयार होतं. हे सारं घडायला शेकडो वर्षे जावी लागतात. त्या संस्कृतीतील अनेक पिढ्यांच्या सततच्या प्रयत्नातून भाषा विकसित होत असते. मग पूर्वी राजे लोक धर्मास जसा आश्रय देत, तसाच ते भाषेसही द्यायचे. त्यातून मग त्या भाषेस दरबारी भाषा मानलं जायचे. दरबारचे हकूमफर्माने, खलिते, सनदा त्या भाषेतून लिहिल्या, प्रकाशित केल्या जात असत. त्यातून ‘राजभाषा' ही कल्पना उदयास आली. आज आपण पाहतो की महाराष्ट्र राज्य सन १९६० मध्ये अस्तित्वात आले. ते केवळ मराठी भाषा व साहित्य विकासाच्या ध्यासातून. हे मराठी राज्य उदयाला यावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रयत्न सुरू होते. गेल्या सुमारे ५४ वर्षांत महाराष्ट्र शासनाने राजभाषा मराठीच्या भाषा आणि साहित्य विकासासाठी मराठी भाषा