पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'विभूती' : राष्ट्र पुरुषांची प्रेरक सूक्ते


 कवी प्रा. भालचंद्र त्रिवेदी यांची राष्ट्रीय काव्यमाला ‘विभूती' भारतभूमीच्या नररत्नांचे स्तुतीस्तोत्र आहे. आज 'बाबा' नि ‘बहन' यांचे स्तोम वाढते आहे. ईश्वरीय पूजा, अध्यात्म यापेक्षा राष्ट्रीय विभूतींची चरित्रे जर नव्या पिढीच्या हातात दिली तर उद्याची पिढी नक्कीच चारित्र्यसंपन्न होईल असा आशावाद, ध्येयवाद घेऊन प्रा. भालचंद्र त्रिवेदी सतत लिहीत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘शिल्पकार' नामक अशीच राष्ट्रीय काव्यमाला नव्या पिढीच्या हाती दिली होती. त्यात ५0 राष्ट्रीय पुरुषांची काव्यात्मक चरित्रे दिली होती. आज ‘विभूती'तून ते आणखी ४0 राष्ट्रपुरुषांची प्रेरक सूक्ते राष्ट्रीय काव्यमालेच्या रूपाने सादर करीत आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

 ‘विभूती'मध्ये त्रिवेदींनी समाजसुधारक, संत, वैज्ञानिक, राजकारणी, इतिहास पुरुष यांच्याबरोबर वर्तमानातील अण्णा हजारे, किरण बेदी यांची काव्यसुमनांद्वारे महिमा वर्णिली आहे. उद्देश स्पष्ट आहे की या सर्वांचे जीवन नव्या पिढीस आदर्शभूत ठरावे. पूर्वी गद्यात्मक चरित्रे असायची. ती घटना नि सनावळ्यांनी कधी कधी रूक्ष व्हायची. आजच्या काव्यगतीचा तसाच घाईचाही. विस्ताराजागी संक्षेपाचे, गद्याच्या जागी पक्षाचे राज्य येत आहे. कारण त्यातून थेंबात समुद्र उफाळण्याची ताकद असते. स्त्री पुरुष विभूतींची ही काव्यपूजा नव्या युगाचे संस्कारदीप अखंड तेवत ठेवतील. त्यातून नव्या पिढीस मूल्यसंवर्धन, चरित्रचर्चा, संस्कार दीक्षा रुजेल. चांगले रुजायचे तर साधनही सक्षम हवे. चरित्र नि चारित्र्यवर्धनासाठी त्रिवेदींनी काव्यसाधन निवडून संस्कार साधनेचा नंदादीप ‘विभूती'तून प्रज्वलित केला आहे. मूल्य -हासाच्या नि चारित्र्यघसरणीच्या आजच्या काळात ही काव्य कुसुमांजली संस्कार संजीवनी ठरेल, असा मला विश्वास आहे.

 ‘विभूती'ची भाषा सुबोध आहे. हे अल्पाक्षरी काव्य असले, तरी आशयघन

वेचलेली फुले/१२७