पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४३)

वाक्ये रसेलची मते म्हणून उचलून घेऊन मनुस्मृतीला आधार घेतला आहे.
 हे युरोपांत झाले. आपल्याकडे अगदी बेटीबंद जाती आहेत. आपल्याकडे कदाचित मनूचे म्हणणे खरे असेल असे पुष्कळांना वाटण्याचा संभव आहे. यांच्यासाठी पुढील विवेचन केले आहे. मनुप्रणीत धंदे कायम ठेवले तरी ज्यांचे वंश टिकले नाहीत व मनुप्रणीत धंदे सोडले तरी ज्यांचे वंश हयात आहेत, अशा सुमारे तीस घराण्यांचे इतिहास एका कोष्टकांत मी बसविले आहेत. ते कोष्टक जरा बोधप्रद होईल. कोष्टकांत जेथे अमुक पिढया जगल्या असे म्हटले आहे तेथे दत्तक न घेता जगल्या असा अर्थ आहे. दत्तक घेऊन जगलेली घराणी जमेस धरली नाहीत.
 घराणे किती पिढया जगले म्हणजे ते जगले म्हणावयाचे, वर्णांतर केल्यानंतर किती पिढ्यांनी नाश झाला तर तो वर्णांतर झाला, असे मानावयाचे याचा खुलासा जोशीबुवांनी केलेला नाही. एके ठिकाणी 'जातीय संकराने समाजाचा नाश, हा जो सृष्टीचा नियम तो काही प्रभावी झाल्यावाचून राहणार नाही. मग तो होण्याला किती पिढ्या लागतील त्या लागोत (पान १७७) असे एक वेडगळ वाक्य त्यांनी लिहून ठेवले आहे. त्यांनी नक्की सांगितले असते तर. त्याच्या उलट उदाहरणे वाटेल तितकी देता आली असती.
 ज्यांनी मनुप्रणीत धंदे कायम ठेवले तरी घराण्याचा नाश झाला, त्यांची यादी पुढे दिली आहे. घराण्याच्या नावांपुढे दिलेले धंदे मनुप्रणीत आहेत:
 (पुढील माहिती परांजपे, बरवे, गोखले वगैरे घराण्यांचे इतिहास, सरदारांच्या कैफियती वंशावळी, पेशवे दप्तर, रिसायती यांवरून घेतली आहे.)