१३५
चूक आहे असें म्हणावेंसें वाटतें. उगाचच्या उगाच गोष्ट लांबविणाऱ्यांचे
दोष दाखविण्यांत अर्थ काय ?
हा अभिप्राय लिहिण्यामध्यें मींहि संयम पाळला पाहिजे; कारण तो
योजिल्यापेक्षां आधींच लांबला आहे. अध्यापन व अभिप्रायलेखन हा अर्धवट
धंदाच ज्याचा झाला आहे त्याला मुलांचे व लेखकांचे दोष काढल्याशिवाय,
मला वाटतें, चैनच पडत नाहीं. म्हणून मला ' अनिरुद्ध प्रवाह' हे पुस्तक
फार आवडले असले तरी कांहीं दोष मी दाखविले. एरवीं खरें पाहिलें
तर हैं पुस्तक वाचून झाल्यावर अगदी पहिल्याप्रथम म्हटल्याप्रमाणें मला सहसा
न मिळणारा असा आनंद झाला होता. कथानक, रचनातंत्र, वगैरेंमध्ये जसें
सुंदर आहे तसेंच भाषेच्या बाबतींतहि आहे. प्रस्तुत 'अनिरुद्ध प्रवाहां 'तील
भाषेचा प्रवाह अनिरुद्ध आहे; तींत कृत्रिमता नाहीं; इष्ट संस्काराला बाधक
होईल अशी उपमादिकांची रेलचेल नाहीं; पण योग्य ठिकाणीं माफक
अलंकार आहेत.
* * *