पान:वनस्पतीविचार.djvu/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वनस्पतिविचार. [प्रकरण 'प्रथम तरतूद व नंतर उत्पात्त' असा सृष्टिनियम ठरलेला आहे. तदनुरूप वनस्पति व प्राणि या दोहोंची परंपरा दिसते. तसेंच भूगर्भ शासवेत्ते म्हणतात की, हल्ली वातावरणांत जे कार्बन आम्लवायूचे सूक्ष्म प्रमाण आढळते, तें प्रमाण पूर्वी एका काली फार अधिक होते. त्या काळी वनस्पति फार जोमाने वाढून त्यांचा विस्तार हल्लीपेक्षां फार मोठा असे, पूर्वी जोमाने वाढलेल्या वनस्पति कालगतीने जमिनीत पुरल्या जाऊन त्यांवर वजनदार खनिज पदार्थाचे दडपण पडल्यामुळे त्यांचे खाणांत सांपडणारे दगडी कोळसे तयार झाले. दगडी कोळसे केव्हां तयार झाले, हे जरी ठाम सांगता येत नाही, तथापि त्यांच्या उत्पत्तीचा काल फारच प्राचीन असावा ह्यात संशय नाही. ज्या काली कार्बन आम्लवायूचे प्रमाण वातावरणात अधिक होतें, तो काल प्राणिवीच्या जीवनसूत्रास प्रतिकूल असला पाहिजे. कारण प्राणिवर्गाची जीवनसूत्रे कार्बन वायूमध्ये चांगली चालत नाहीत; पण उलटपक्षी तो वायु वनस्पतीस फार हितावह असल्यामुळे त्यांची वाढ - त्या काळी अधिक जोमाची होती. यावरून एवढे खास म्हणतां येईल की, वनस्पतींच्या अनुकूल कालांत प्राणिवगीची प्रगति फार कमी असून त्यांचे अस्तित्वही फार थोड्या प्रमाणांत असावे असे ठरते, ततेच जर प्राणिवर्गाचे अस्तित्व त्यावेळी फार घोड़ें होतें, तर असें कां म्हण नये, की प्रथम वनस्पतिवर्ग अस्तित्वात येऊन तिच्या अनुकूल कालांत त्या वर्गाची वाढ अतिविस्तृत झाली, व त्याबरोबरच नुकती कोठे प्राणिवर्गाच्या अस्तित्वास सुरुवात झाली होती. सारांश, वनस्पतिवर्ग प्रथम अस्तित्वात येऊन मागाहून प्राणिवर्ग उत्पन्न झाला असे म्हणता येईल. उत्कांतिनियमानुसार प्रथम साधी व सरळ सृष्टि उत्पन्न होऊन नंतर त्यांत कमी-अधिक फरक होत गेले. फरक होत असतांना क्रमाक्रमाने आश्चर्यकारक संकीर्णता सृष्टिरचनेत येत गेली. या सिद्धतत्वाप्रमाणे वनस्पतिकोटी प्राणिकोटीपेक्षां प्रथम निर्माण झाली असली पाहिजे. कारण प्राणिवर्गापेक्षां वनस्पतिकोटी साधी व सुलभ रचनेची आहे. प्राणिकोटीमध्ये अधिक दुर्गम व संकीर्णरचना दृष्टीस पडते, म्हणून प्राणिवीची उत्पति "नंतर झाली असावी...