पान:वनस्पतीविचार.djvu/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वनस्पतिविचार. [प्रकरण -- wwwwwwwwwwwwwwwwwwwwwww ह्याच प्रकारची पाणी वर चढण्याची क्रिया असावी, असें अनुमान काढीत असत; पण हा कोटिक्रम अलीकडील शोधाअंती चुकीचा ठरत आहे. एक तर कांहीं वाहिन्यांची बुडाकडे तसेंच अग्रांकडे तोंडे बंद असल्यामुळे अशा प्रकारची केशाकर्षक ( Capillary ) किया त्यांमध्ये सुरू होणे अशक्य असते. तथापि जरी अशी क्रिया सुरू झाली अशी कल्पना केली तरी, त्यामुळे पाणी दूरवर चढणे शक्य नसते. फारतर थोड्या अंतरापर्यंत ह्या क्रियेने पाणीवर जाऊं शकेल. पण मुळाच्या क्षुद्रपेशीपासून खोडांत, तसेंच खोडांतून पानांस अथवा निरनिराळ्या फांद्या व पोटफांद्यांतून शेंड्यापर्यंत पाणी वर चढणे ह्या रीतीने शक्य नसते. कारण आम्हांस शेंड्यावरील पानांतून सुद्धा पाणी गळलेले दृष्टीस पडते. शिवाय ही गोष्ट उघड आहे की, पुष्कळ झाडांत जेव्हां बाह्यत्वचेपासून बाष्पीभवनाचा जोर कमी असतो, अशा वेळेस, द्रवात्मक रस जोराने वर चढत असतो; म्हणजे बाष्पीभवनामुळे उत्पन्न होणारा अंतर् जोर नसतांनासुद्धां ज्याअर्थी रस जोराने वर चढतो, त्याअर्थी दुसरी एखादी शक्ति अशी असली पाहिजे की, त्यामुळे हे रसाचे वर चढणे घडत असले पाहिजे, व ती दुसरी शक्ति म्हणजे 'मूल जनित शक्ति ' ( Root pressure ) असें आतां सिद्ध झाले आहे. झाडांस पूर्ण पालवी फुटली नसतांना हिवाळ्याचे शेवटी व वसंत ऋतूचे सुरवातीस हे चमत्कार विशेष पाहण्यांत येतात. खरोखर हिवाळ्यांत झाडांतून पाण्याचे बाष्पीभवन कमी होत असते, शिवाय ज्यांतून बाष्पीभवन होतें ती साधनें म्हणजे झाडांची पाने ही त्यावेळेस पूर्ण नसतात. म्हणून अशा चमत्कारांत बाष्पीभवन अथवा बाष्पीभवनोत्पादित जोर यांचा मुळीच संबंध नसतो. केवळ ऑस्मॉसिसूक्रियेनें पेशीत पाणी शिरून मुळांच्या पेशी तणाणून त्यापासून उत्पन्न होणारा मुळांचा जोर (Root pressure ) असल्या चमकारास कारणीभूत असतो. मुळांच्या शोषकक्रिया सभोवतालच्या परिस्थिती. वर अवलंबून असतात. विशेषेकरून हवेची तसेंच जमिनीची उष्णता असली तर मुळाच्या जोराने बाहेर जाणारे पाणी अधिक जोराने वाहूं लागते, व त्यामुळे वनस्पतीचे बरेच नुकसान होते. ज्यावेळेस बाप्पीभवन अधिकाधिक होऊ लागते, त्यावेळेस मुळांत उत्पन्न होणाऱ्या जोरामुळे घडणारे चमत्कार कमी होऊ लागतात. तसेच उलट जेव्हां हे चमत्कार अधिक होत असतात, त्यावेळेस