पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचानालय सातारा .


मी अविवेकाची काजळी। फेडूनि विवेकदीप उजळी
ते योगिया पाहे दिवाळी। निरंतर॥

 जी अविवेकाचा काळा अंधार नाहीसा करते आणि विवेकाचे ज्ञानाचे दीप उजळवते, ती 'योगियांची दिवाळी' आहे. तुकाराम महाराजांनी 'साधुसंत येति घरा तोचि दिवाळी दसरा' असं म्हटलं आहे. इथे त्यांना सत्संग अपेक्षित आहे. चांगल्या आचार-विचारांच्या सहवासात राहणे हे ते दिवाळीच मानतात.

 मुघल कारकिर्दीत अकबर बादशहा दिवाळी दिवशी महालात सर्वत्र दीपोत्सव करत असे. दौलतखान्यासमोर चाळीस फूट उंचीचा स्तंभ रोवून त्यावर मोठा दीपक पेटवत असे. असे उल्लेख ‘ऐने अकबरी'मध्ये आहेत.

 एकंदरीत दिवाळीला खास परंपरा आहे. तिचं असं वेगळं अस्तित्व आहे. तिच्याशी अनेक कथा, घटना, प्रसंग यांचा संबंध दर्शविला आहे. सर्व लोक अजूनही दिवाळीसंबंधी इतकंच म्हणतात व म्हणत राहतील. 'स्नेहल, मंगल, सोज्वल, निर्मल दिवाळी दरवर्षी या पृथ्वीतलावर अवतार घे आणि आमची मने, जीवने तेजाळून टाक.'

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १६७

राजेंद्र माने