Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ४०१

कारकीर्दीत सुखनिधान नावाच्या माणसाने घेण्याचा प्रयत्न केला व बरीच गडबड उडविली.
 (२) चतुरसिंग भोसले हे धाकट्या शाहूचे सख्खे भाऊ. ते हुशार व धाडशी असल्याचे आणि म्हणून छत्रपतींच्या गादीस लायक असल्याचे रियासतकार सरदेसाई सांगतात. इ. स. १८०३ मध्ये इंग्रजांची मदत घेऊन दुसरा बाजीराव पेशवेपदावर आला हे त्यांना आवडले नाही. म्हणूनच पुढे शिंदे व इंग्रज यात झालेल्या धुमश्चक्रीत त्यांनी शिंद्यांची बाजू घेतली.
 (३) ब्रिटिशांच्या अमदानीत महाराष्ट्रात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक छोटे मोठे उठाव झाले. १८४६ मधील उमाजी नाइकांचे दरोडे दंगे हे यातीलच होत.
 (४) उमाजीच्या दंग्यासारखेच राघू भांगऱ्याचे १८४४ मधले दंगे होत. त्याने इंग्रजांचे अधिकारी व पोलिस ठार मारून आणि सरकारचा पाठपुरावा करणाऱ्या लोकांची नाके कापून सरकारला सळो की पळो करून सोडले.
 (५) पेंढारी हे लूटमार करणारे लोक शिंदे-होळकरांसारख्या मराठे सरदारांच्या फौजात यांची पथके असत. युद्ध आटोपले म्हणजे मग ही पेंढाऱ्यांची पथके मोकाट सुटून उच्छाद मांडत. पुढे पुढे त्यांचा उपसर्ग समाजास फारच पोहोचू लागला. (कालांतराने इंग्रजांनी त्यांचा पक्का मोड केला.)
 (६) महादजी शिंदे मरण पावल्यावर त्यांच्या स्त्रिया लक्ष्मीबाई, भागीरथीबाई, यमुनाबाई आणि अंगवस्त्र केशरी यांच्यावर सर्जेराव घाटगे यांनी अत्याचार करून त्यांना जबरदस्तीने नगर येथे अटकेत ठेवले (१७९८). दुसऱ्या बाजीरावाचा भाऊ अमृतराव व यशवंतराव होळकर यांनी आणि बुंदेलखंडातील लखबादादा यांनी या स्त्रियांची बाजू घेतली. यातून जे वादंग निर्माण झाले ते तीन चार वर्षे टिकले.
 (७) दुसरा बाजीराव व परशुरामपंत प्रतिनिधी यांचे संबंध सलोख्याचे नव्हते. तेव्हा बाजीरावाचे सेनापती बापू गोखले यांनी परशुरामपंतास कैद करून मसूरच्या गढीत डांबून ठेवले (१८०६). पंतांची रखेली ताई तेलीण हिने वासोटा किल्ल्याच्या आश्रयाने पुंडावा केला. (पुढे धान्य अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे व अन्य रसद मिळणे शक्य नसल्यामुळे ८ महिन्यांनी तिला गोखल्यांपुढे दाती तृण धरून जावे लागले.)