कोणत्याही विषयाच्या शोधयात्रेचा नाद लागला की त्यात व्यक्तीमनाचं अस्तित्व बुडून जातं. तसा नाद लागला. भारतीय जीवनप्रणालीत 'बाई' च्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा. मग गीता साने, आ.ह.साळुंके, पुष्पा भावे, गुरुवर्य प्रभाकर मांडे, स. रा. गाडगीळ अशा अनेकांच्या साक्षी. ग्रंथ.. प्रत्यक्ष चर्चा.. काळही बदलतच असतो.
..आणि १९९५ च्या बिजींगच्या जागतिक महिला परिषदेत इराणची ती सखी भेटली. भर उन्हात काळा बुरखा घालून फिरणारी. बरोबर पुरोगामी पुरूष होते. हसण्या इतपत ओळख झाली. आणि तिला एकटीला गाठून मी विचारलेच. खूप गोड हसून तिने उत्तर दिले.
"जर मी हा बुरखा पांघरला नसता तर तुझी नी माझी.. एवढ्या महिलांची भेट झाली असती? आणि 'विमेन्स राईटस् आर ह्यूमन राईटस्' या घोषणेचे संदर्भ कळले असते? आपण कितीही दूर दूर असलो तरी हातात हात घट्ट धरून कडं करू या. बरोबरचे पुरूषही नव्या विचारांचे स्वागत करणारे प्रत्येक देशात, धर्मात आहेत. त्यांचे हात हाती घेतले तर जग आपल्याला 'माणूस.. स्वतंत्र परिपूर्ण व्यक्ती' म्हणून नक्कीच मान्यता देईल..."
□
रुणझुणत्या पाखरा / ३