पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५९२
 


दिवा विझण्यापूर्वी
 खर्ड्याचा विजय हा मराठ्यांच्या वैभवाचा कळस होय, असे वर म्हटले आहे. मराठ्यांना तसे वाटत होते यात शंका नाही. पण याचा अर्थ असा की त्यांना जगाचे ज्ञान नव्हते. स्वपर बलाबलाची कल्पना नव्हती. इतिहास, भूगोल, माहीत नव्हता. इंग्रज कोण आहेत हे त्यांना समजले नव्हते. एरवी गेल्या वीस पंचवीस वर्षांचा इतिहास डोळ्यापुढे असताना, त्यांना तसे वाटले नसते. दिवा विझण्यापूर्वीचा हा उजाळा आहे, असे फार तर वाटले असते.