या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०३
प्रेरणांची मीमांसा
परिवर्तन
पण एवढे साधले नाही तरी जे साधले ते साधले असे म्हटले पाहिजे. शिवछत्रपतींच्या आधी मराठे पराक्रमी होतेच. पण त्यांचा पराक्रम मुस्लिमांची राज्ये रक्षून वतने मिळविण्यात खर्ची होत होता. आता स्वराज्याचे रक्षण करून वतने मिळविण्यासाठी मराठे पराक्रम करू लागले. हे मानसिक परिवर्तन, ही क्रान्ती काही उपेक्षणीय नाही.
■