बाळ दत्तक घेताना....
संयुक्त राष्ट्रसंघाने १९९४ हे वर्ष ‘कुटुंब वर्ष' म्हणून जाहीर केले आहे. हे वर्ष जाहीर करत असताना एकीकडे सारं जगच एक कुटुंब बनत आहे याकडे जसे संयुक्त राष्ट्रसंघास लक्ष वेधायचे आहे तसेच कुटुंब व्यवस्थेची सध्याची अनास्थाही लक्षात आणून द्यायची आहे. आपलं आजचं सारं जीवनच लक्षात आणून द्यायचे
आहे. आपलं आजच सारं जीवनच कसं विसंगत होत चाललंय! एकीकडे जन्म दिलेली मुलं आई-वडिलांकडे पाहीनाशी झालीत तर दुसरीकडे जोडलेल्या, रक्तसंबंध नसलेल्या माणसांची, दृष्ट लागावी अशी कुटुंबं अत्यंत जिव्हाळ्यानं एकमेकांचं करतानाचं सुंदर दृश्य समाजात पहावयास मिळतं. घर, कुटुंब नको असतं कुणाला? अगदी कावळ्या, चिमणीला, किडे-मुंगीलाही त्याचा कोण सोस असतो. आपल्या घरात घरटं करणाच्या चिमणीला कितीही हुसकावून लावा ती घरटं बनवायचा ध्यास काही सोडून देत नाही. प्रत्येकाला हवं असतं एक लहान घर पंख मिटून पडण्यासाठी. पक्षालाही आणि माणसालाही.
पण असं घर थोडंच सगळ्यांच्या वाट्याला येतं! सर्व काही असून केवळ मुलंबाळ नसल्याने दुःखी असलेली कितीतरी दाम्पत्यं आपल्या आजूबाजूस असतात. अशीच समाजात असतात अनेक अनाथ मुलं-मुली. त्यांना हवे असतात आई-वडील. या दोन्हींना सुखी करण्याचं काम आपल्या समाजात करणा-या अनेक सेवाभावी संस्था आहेत. अगदी महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाले तर सध्या दहा हजार कुटुंबे अशी आहेत की, ज्यांनी अपत्य नसल्याचा शोक करीत न बसता, उपचारात अनावश्यक वेळ न दवडता जवळच्या अनाथाश्रम, बालसदन, दत्तक प्रचार संस्थांशी संपर्क साधून मूल दत्तक घेतलं नि सुखाने ते आपले जीवन कंठीत आहेत. आता दत्तक घेणं अगदी सोपं झालंय. शिवाय त्यासाठी भरपूर