व्यवस्था करण्यात आली. या ठेवीची पावती सावित्रीबाईंकडे ठेवण्याच्या सयाजीरावांच्या हुकूमाप्रमाणे ही पावती रजिस्टर पत्राने सावित्रीबाईंकडे पाठवण्यात आली.
यासंदर्भात महादू सहादू वाघोले यांची आठवण महत्त्वपूर्ण आहे. वाघोले म्हणतात, “तात्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब सावित्रीबाई व मुलगा यशवंता यांना फार वाईट दिवस आले. त्यांना खाण्याकरता व यशवंताचे शिक्षणाकरिता बिलकूल पैसा नव्हता. ही गोष्ट तात्यांच्या मित्रांनी श्रीमंत सयाजीराव महाराज यांच्या कानावर घातली. तेव्हा महाराजांनी काही रक्कम सावित्रीबाई यांच्याकडे पाठविली होती त्या रकमेवर बरेच दिवस त्यांनी जुगताईने आपला उदरनिर्वाह व यशवंताचे शिक्षण चालविले होते.” सयाजीरावांनी केलेल्या मदतीमुळेच फुलेंच्या पश्चात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई आणि मुलगा यशवंत सन्मानपूर्वक आयुष्य जगू शकले याची साक्ष वाघोलेंची ही आठवण देते. १८९७ मधील प्लेगच्या साथीत आपला जीव धोक्यात टाकून रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉ. यशवंतचे सुरुवातीचे शिक्षण सयाजीरावांच्या आर्थिक पाठबळावरच झाले होते.
सावित्रीबाईंना पेन्शन मंजूर करतेवेळीच सयाजीरावांनी धामणस्करांकडे महात्मा फुलेंच्या स्मारकाची आवश्यकता व्यक्त केली होती. यासंदर्भात महाराज धामणस्करांना म्हणाले, " जोतीबांचे स्मारक होणे जरूर आहे आणि ते करण्याचे