पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नावाची आणखी एक हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची संघटना येथे कार्यरत होती. बंगालचे अरविंद घोष या संघटनेचे सेक्रेटरी होते. मुंबईहून गेलेले केशवराव देशपांडेही येथे येत. लंडनमधील या क्रांतिकारी विचारांच्या गटात खासेराव जाधव सामील झाले. खासेराव १८९० ला शिक्षण पूर्ण करून भारतात परतले.

 लंडनमध्ये असताना केशवराव देशपांडे, गोविंदराव माडगावकर आणि अरविंद घोष यांच्यात त्यावेळी झालेली मैत्री आयुष्यभर टिकली. अरविंद घोष आणि केशवराव देशपांडे यांनाही बडोद्यात आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका खासेरावांची होती. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने प्रयत्न करणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना सयाजीराव खासेरावांमार्फत सहकार्य करत असत.

 खासेराव जाधव, त्यांचे लहान बंधू मेजर माधवराव, प्रो. माणिकराव यांनी अरविंद घोष बडोद्यात येण्यापूर्वी समविचारी मित्रांचा गट असणारी 'तरुणसंघ' नावाची संघटना स्थापन केली होती. संघटनेच्या सभासदांत बडोदा सरकारच्या नोकरीतील अनेक अधिकारी नोकर होते. खासेराव जाधवांच्या घरी या संघटनेच्या बैठका होत असत. पुढे अरविंद घोष व केशवराव देशपांडे बडोद्यात आल्यानंतर या संघटनेच्या कामास अधिक वेग आला. अरविंद घोष खासेरावांच्या घरीच राहू लागले. खासेव जाधवांचे निवासस्थान हे क्रांतिकारकांचा अड्डा बनला. या ठिकाणी बाळ गंगाधर टिळक, सयाजीराव, अरविंद घोष यांच्या

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / १६