पान:महमद पैगंबर.djvu/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० पाकिस्तानचे संकट आणि समजा, पाकिस्तान प्रस्थापनेनंतर रातोरात आणि हातोहातं मुसलमान पार बदलले आणि ते अगदी देव माणूस झाले तरी, कटकटी टाळण्यासाठीं हिंदूंनी पाकिस्तान मान्य करावे हे म्हणणेच बुद्धीला आकलन होण्यासारखे नाहीं ! कटकट टळावी हीच सर्वश्रेष्ठ इच्छा हिंदूंच्या मनांत नांदत असेल तर, त्यांनीं पिंडाएवढा भात खाऊन प्रेताप्रमाणे पडून राहण्याला तयार व्हावे, म्हणजे झालें ! मनाची ही तयारी झाली कीं सगळ्या कटकटींचे मूळच संपलें ! पण, हिंदु हे ज्या अर्थी इंग्रजांपासून स्वराज्य मिळविण्याला निघाले आहेत आणि ते स्वराज्य टिकविण्याची व चालविण्याची हिंमत ते मनांत बाळगीत आहेत त्या अर्थी त्यांना कटकटींचा कंटाळा आला असेल, असे दिसत नाहीं. कारण, स्वराज्य मिळविणे हे जसे कटकटीचे काम आहे तसेच मिळालेले स्वराज्य टिकविणे हेंहि कटकटीचेच काम आहे. केवळ देशांतील शांततारक्षणाचे काम करणा-या व त्या कामासाठीं प्रांतांकडून ओझ्यावारी पैसे कराच्या रूपाने घेणाच्या मध्यर्वात सरकारची आवश्यकता तरी काय आहे, असे हिंदुहिंदुस्थानांतील कांहीं प्रांत आज ना उद्यां म्हणू लागतील असे भेसूर भविष्य डॉ० आंबेडकरांनीं वर्तविले आहे.* डॉ० आंबेडकरांचे हें भविष्य केवळ कल्पनानिमित नसेल, त्याला कांहीं आधार असेल तर स्पष्टपणे असे म्हणावें लागेल की, स्वराज्याची शाब्दिक मागणी करणा-या हिंदूंना स्वराज्याचा व्यावहारिक अर्थच समजलेला नाहीं. 'पोट आणि अवयव' या जुन्या गोष्टींतला मतलब न ओळखून, हिंदु यापुढेहि खंबीर मध्यर्वात सरकार आणि राष्ट्ररक्षणाला समर्थ असे खंबीर, चतुरंग,अद्ययावत् लष्करी सामर्थ्य यांच्याकडे दुर्लक्ष करणार असतील तर, स्वराज्याची सारी चळवळ समुद्राच्या खाया पाण्यात विरून जाईल, यात शंकाच नाहीं. स्वराज्य म्हणजे सैन्यसामर्थ्य; आणि, तें सैन्यसामर्थ्य टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी राष्ट्राच्या सर्व अवयवांनीं सिद्ध असणे हेच जबाबदारीचे स्वराज्य !

  • Thoughts on Pakistan, p. 7.