पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जावयास निघाला त्यावेळी काशीचे काम उरकून घ्यावयाची कामगिरी बाळाजीने जयाप्पाला सांगितली होती. पुढे जयाप्पा कुंभेरचा वेढा झाल्यानंतर काशीकडे जाणार तो त्याला नागोरची कामगिरी आली व काशीचे काम तसेंच तहकूब ठेवून द्यावे लागले. तरी देखील बिजेसिंगाचें पारपत्य केल्यावर काशीकडे जाण्याचा त्याचा उत्कट मनोदय होता. लेखांक ३१ त १७५४ च्या मार्गात बाबूराव महादेवाला जयाप्पा लिहितो, "तुमचा उपराळा करून श्रीचे काम शेवटास न्यावे यापरतें दुसरे अधिकोत्तर नाही". पुढे १७५४ च्या आगष्टांत जयाप्पा पुन: लिहितो, “ त्यांचे पारपत्य यथायुक्त करून श्रीक्षेत्रांत अंमल खुलासा करणे हे गोष्ट चित्तांत फारशी आहे."जयाप्पा १७५५ त वारल्यानंतर १७५९ त दत्ताजीला काशी, प्रयाग व बंगाल ह्या प्रांतांवर स्वारी करण्यास बाळाजीने सांगितले; परंतु, अबदालीच्या गडबडीमुळे तें काम तसेंच राहिले व पुढे कधी श्री मराठ्यांच्या हातांत आली नाही. दक्षिणेत सलाबतजंगावर १७५१, १७५२, १७५७ व १७६० ह्या साली पुण्याकडून व १७५३, १७५४ व १७५५ ह्या सालांत खानदेश, अलजपूर, येलगंदल वगैरे प्रांतांच्या राखें मराठ्यांनी सलावतावर स्वाऱ्या केल्या व त्याच्या हातांतून "बहुतेक सगळी दक्षिण १७६० त मोकळी केली" ( लेखांक १६६). १७५१ त चार लाखांचा मुलूख, १७५२ त पन्नास लाखांचा मुलख, १७५७ त पंचवीस लाखांचा मुलूख व १७६० त साडेएकसष्ट लाखांचा मलख सलावतापासून बाळाजीनें घतला. शिवाय १७५५ । ५६ त पंधरा लाखांचा मुलूख परशुराम महादेवाच्या हस्ते मिळाला तो निराळाच ( लेखांक ६५). तसेंच जानोजी भोसल्यानेहि पाईनगंगेच्या अलीकडे आपलें घोडें बरेंच ढकलिलें होतें. सारांश, १७६० त सलाबताजवळ तेलंगणाचा पट्टा तेवढा उरला होता. बाकीचा सर्व मुलूख मराठ्यांच्या ताब्यात आला होता. १७५९ पर्यंत बहादूरभेडा, बेदनूर, होळीहोन्नूर, सावनूर, सोंधे वगैरे ठिकाणचे पाळेगार बहुतेक सर्व पादाक्रांत करून पेशव्यांनी ह्मसूरचे राज्य बहुतेक संपुष्टांत आणिले. पुढे तें संस्थान हैदरअल्लीच्या ताब्यात गेले. तेव्हा ते अजीबात खालसा करावे असा सदाशिवरावभाऊचा मनोदय होता. परंतु, अबदालीच्या गडबडीमुळे तें काम लांबणीवर टाकणे भाग पडले. कोकणांत शामळाची कासें, उंदेरी वगैरे स्थले व तुळाजीचे विजयदर्ग वगैरे किल्ले बाल जीने घेऊन, बहुतेक सर्व कोंकणपट्टी सोडवून घेतली. येणेप्रमाणे १७६० पर्यंत, लाहोर. मुलतान, ठठा, भकर, अंतर्वेद, रोहिलखंड, कटक, नागपूर, माळवा, गुजराथ, काठेवाड. खानदेश, औरंगाबाद, विजापूर, कोंकण व किल्ले कोपलपर्यंत सर्व मुलूख मराठ्यांच्या साक्षात् अमलाखालों बाळाजीच्या राजनीतीने आणिला. येथपर्यंत मजल आणून ठेपल्यावर महाराष्ट्रधर्माचा प्रसार आणीक करावयाचा तो अबदालीची धाड आली आणि कांहीं कालपर्यंत आहे तेंच राखण्याच्या खटपटींत पेशव्यांस पडावे लागले. ती खटपट १७६१ च्या पुढली असल्यामळे तिचा विचार मी येथे करीत नाही. इतकेच सांगन ठेवितों की, ह्याहि खटपटीत व्यवस्थित धोरण होतें (भारतवर्षांतील पत्रे, यादी वगैरे,